शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

आठवलेंच्या रिपाइंला हवा दक्षिण मध्य किंवा ईशान्य मुंबई मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 6:01 AM

युतीतील घटक पक्षांचे रुसवे-फुगवे : रासपला हव्यात पाच जागा

मुंबई : शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता घटक पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंसाठी मुंबईतून दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडावा. तसेच, सोलापूर, लातूर आणि रामटेक या तीनपैकी एक जागा सोडावी, अशी मागणी रिपाइने केली आहे. सोमवारी वांद्रे येथे रिपाइं नेते, पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव शिवसेना आणि भाजपाला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता घटक पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्री महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) पाच तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंसाठी दोन जागा मागितल्या आहेत. आम्ही एनडीएसोबत राहू, मात्र शिवसेना आणि भाजपाने त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिपाइंसाठी सोडावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात युतीतील जागावाटपाची घोषणा झाली. या जागावाटपानुसार शिवसेना २३ तर भाजपा २५ जागा लढविणार आहे. युतीच्या या जागावाटपावर रामदास आठवले यांनी आक्षेप घेतला आहे. सोमवारी वांद्रे येथे रिपाइं नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंसाठी मुंबईतून दक्षिण मध्य मुंबई किंवा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडावा. तसेच, सोलापूर, लातूर आणि रामटेक या तीनपैकी एक जागा सोडावी, असा प्रस्ताव शिवसेना आणि भाजपाला देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

रिपाइंने दोन जागांची मागणी केली असताना रासपने भाजपा-सेना युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे. येत्या ५ मार्चला रासपने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. धनगर आणि मुस्लीम आरक्षणाबाबत या मेळाव्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे रासपने स्पष्ट केले.एनडीएतच राहण्याचा निर्णययुतीचा निर्णय घेताना विश्वासात घेण्यात आले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश गेला आहे. नाराजी असली तरी स्वबळावर अथवा तिसºया, चौथ्या आघाडीच्या पर्यायांचा विचार न करता एनडीएत राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :mumbai-south-central-pcमुंबई दक्षिण मध्यLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRamdas Athawaleरामदास आठवले