शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता मिळताच झोपड्यांचा प्रश्न सोडवू

By admin | Updated: October 7, 2014 05:43 IST

महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झोपड्यांचा प्रश्न जटिल होत आहे. माहितीप्रमाणे बीकेसीमधील एका झोपडीची किंमत एक कोटींच्या घरात आहे

डोंबिवली/कल्याण : महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झोपड्यांचा प्रश्न जटिल होत आहे. माहितीप्रमाणे बीकेसीमधील एका झोपडीची किंमत एक कोटींच्या घरात आहे. त्यामुळे संबंधित परप्रांतीय येथील घरे विकून आजमगढ, प्रतापगढ आदी ठिकाणी स्थिरावतात. हे चित्र नको असेल तर मला सत्ता दिल्यास सत्तेच्या पहिल्याच दिवशी झोपडपट्ट्यांचा विषय निकाली लावेन, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. भाषणाच्या शुभारंभाला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला. डोंबिवलीतील डीएनसीच्या मैदानातील सभेत त्यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, सत्ता दिल्यास महाराष्ट्रातील युवक-युवतींनाच रोजगाराची संधी देण्यात येईल. परप्रांतीयांनी येथून त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जावे. त्यांना या ठिकाणी रोजगार मिळणार नाही. आपण त्यांना सर्व सुविधा द्यायला, हा काय कबुतरांचा खुराडा आहे का, अशा शब्दांत त्यांनी परप्रांतीयांवर टीकेची झोड उठवली. राज्यात ५५ वर्षे ज्यांची सत्ता आहे त्यांनी आतापर्यंत ना रस्ते दिले, ना अखंड वीज दिली. केवळ खड्डेमुक्त रस्त्यांचा नारा दिला. त्याची पूर्तता करण्यासाठी काय रॉकेट सायन्स आहे का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.सीमेवर जवान शहीद होत असताना मोदी महाराष्ट्रात प्रचार करण्यात दंग आहेत, ही शोकांतिका नाही का? देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रचाराला येतो, यावरूनच येथील त्या पक्षाच्या नेत्यांची काहीही लायकी नाही, असे स्पष्ट होत आहे. स्व. गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागले नसते, असे खुद्द मोदींनीच बीडच्या सभेत स्पष्ट केले. आता आगामी काळात कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या महापालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका होत आहेत. त्यालाही पंतप्रधान येतील. केवळ पक्ष प्रचारासाठी पंतप्रधान कार्यालय बंद ठेवून हिंडणारा अशी त्यांची जागतिक कीर्तीची ख्याती होत आहे. मोदींनी कितीही सभा घेवो, मला त्याची फिकीर नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपाच्या होर्डिंग्जवर मोदींचा फोटो लावावा लागतो, ही त्यांच्या येथील नेत्यांची शोकांतिका असल्याची टीका त्यांनी केली.महायुतीसह आघाडीच्या फुटीबाबतही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, हे सर्व प्री-प्लॅन होते. मात्र जनतेला नेहमीप्रमाणेच फसवले गेले. त्यांना या वेळेसही गृहीत धरले गेले आणि म्हणूनच महायुती तुटली की आघाडी तुटणार, हे समीकरण सहा महिन्यांपूर्वीच ठरल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.(प्रतिनिधी)