शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना हा ढोंगी पक्ष

By admin | Updated: March 19, 2015 23:50 IST

नारायण राणे : जैतापूर प्रकल्पाच्या आंदोलन प्रकरणावर टीका

कणकवली : जैतापूर प्रकल्प रद्द करू यांसह अनेक आश्वासने निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने जनतेला दिली होती. मात्र हा प्रकल्प ते रद्द करू शकले नाहीत, हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. जैतापूर प्रकल्प रद्द करण्याची क्षमता शिवसेनेत नसून हा ढोंगी पक्ष आहे, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.ओसरगाव येथील महिला भवनात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारीणीची बैठक गुरूवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ओसरगाव येथे आलेल्या नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेच्या जैतापूर प्रकल्पाविषयीच्या आंदोलनावरून प्रतिक्रिया दिली. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, शिवसेना हा जनतेची दिशाभूल करणारा पक्ष आहे. सत्ता भोगून आंदोलन करणे हा निव्वळ नाटकीपणा आहे. शिवसेनेचे हे नाटक जनतेला कळलेले आहे. कोकणातील जनता सूज्ञ असून शिवसेनेचा ढोंगीपणा न कळण्याइतपत येथील जनता अज्ञानी राहिलेली नाही. सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि त्याच सत्तेच्या विरोधात आंदोलन करायचे, अशी दुटप्पी भूमिका शिवसेना घेत आहे. त्यांची ताकद असेल तर त्यांनी जैतापूर प्रकल्प रद्द करून दाखवावा. राज्याबरोबरच देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. मात्र, केंद्र आणि राज्य शासन अनेक निर्णय चुकीच्या पद्धतीने घेत आहे. जनतेला वेठीस धरले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करून सत्तेत राहून आंदोलन करण्याचे नाटक शिवसेना करीत आहे. (वार्ताहर)जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यतत्पर बनाजनसामान्यांना महागाईबरोबरच अनेक समस्या भेडसावत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आता कार्यतत्पर बनावे. पक्षाने जबाबदारी दिल्यास मुंबई- बांद्रा येथून निवडणूक लढविण्यास मी तयार आहे. मात्र असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व मी करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे. पक्ष संघटना बळकटीबरोबरच जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असेही नारायण राणे यांनी ओसरगाव येथील जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र, या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नसल्याने अधिक तपशील समजू शकला नाही.सत्तेत योग्य वाटा न मिळाल्यानेच आंदोलनकेंद्रात आणि राज्याच्या सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही किंवा मुंबईत योग्य सेटलमेंट झाली नाही म्हणून शिवसेनेने जैतापूरचे आंदोलन केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. जैतापूर प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झालेले आहे. मग हे आंदोलन कशासाठी? शिवसेनेला राज्यात योग्य खाती मिळाली असती तर असे आंदोलन केले असते का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैतापूर प्रकल्प होणारच, अशी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंचे मोदींसमोर काही चालत नाही, हे एकप्रकारे दाखविणारे शिवसेनेचे आंदोलन आहे, असे यावेळी माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितले.