शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

शिवसेनेकडून राहुल गांधींचे कौतुक, अयोध्येतील निकालानंतर 'सामना' रंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 8:00 AM

बाबराच्या खुणा आधी शिवसैनिकांनी मिटवल्या, आता राष्ट्रीय मुसलमानांनी मिटवाव्यात.

मुंबई - राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी भाजपा आणि शिवसेनेतील वाद देशाच्या चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे भाजपाने सर्वात मोठा पक्ष असतानाही आपण सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगत, शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या 27 वर्षांपासून सुरु असलेल्या राम मंदिराच्या न्यायालयीन लढाईनंतर अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा वाद संपुष्टात आला आहे. मात्र, या राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, हा निकाल आला. त्यामुळे सर्वच पक्षांकडून सावध भूमिका घेत, या निकालाचे स्वागत करण्यात आले. आता, या निकालानंतर शिवसेनेनं राहुल गांधींचं कौतुक केलं असून पंतप्रधान मोदींचा उल्लेखही केला नाही.

'आपल्या मित्रपक्षाला आणि विशेषत: त्यातील काही निवडक नेत्यांना प्रचंड अहंकाराने पछाडले असून, शिवसेनेचा केवळ वापर करून घेण्याचे त्यांचे धोरण आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका करतानाच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याचा मानस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. तर, खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेस राज्यातील जनतेच्या विरोधी नाही, असे म्हणत काँग्रेसचे गोडवे गायले आहेत. त्यानंतर, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून आज राहुल गांधींच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांचं कौतुक करण्यात आलंय. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचा उल्लेखही करण्यात आला नाही. 

बाबराच्या खुणा आधी शिवसैनिकांनी मिटवल्या, आता राष्ट्रीय मुसलमानांनी मिटवाव्यात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे या निर्णयाचे स्वागत केले. अयोध्येचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्याचे स्वागत करू असे राहुल गांधी म्हणाले. हा सामंजसपणा आहे, हा सामंजसपणा औवेसीसारख्या नेत्यांनी दाखवायला हरकत नव्हती, असे म्हणत सामनातून राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेखही सामनातून करण्यात आला नाही. उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून मोदी सरकारकडे राम मंदिराची मागणी अनेकदा केली आहे. पण, निकालानंतर मोदींचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी स्थापन होऊन, सरकार बनेल, अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. त्यात, एनडीए सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलंय.  

बहुमत सिद्ध करूभाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्याने दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केले आहे. बहुमत सिद्ध करण्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी