शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कराडकर यांचे निधन

By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST

अंत्यदर्शनासाठी गर्दी : आज सांगलीत अंत्यसंस्कार

सांगली : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पुरोगामी कृतिशील कार्यकर्ते आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील यांचे निकटचे सहकारी नामदेवराव बाळकृष्ण कराडकर (वय ९१) यांचे आज, मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढ्यातील आणखी एक दुवा निखळल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच होते. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, चतुरंग अ‍ॅडव्हर्टायझर्सचे संचालक, कवी महेश आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते राजेश ही दोन मुले, दोन विवाहित कन्या, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. दादा नावाने परिचित असलेल्या नामदेवराव कराडकर यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. क्रांतिलढ्याची पत्रके वाटणे, क्रांतिकारकांचे संदेश पोहचविणे, स्फोटके आणि शस्त्रांचा साठा सुरक्षित ठेवणे यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ते ब्रिटीशांविरोधात लढले. क्रांतिलढ्यात त्यांनी वसंतदादांसोबतच कारावास भोगला होता. २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा तुरुंग फोडण्याची कामगिरी करणाऱ्या वसंतदादांसोबतच्या क्रांतिकारकांच्या गटात ते सहभागी होते. स्वातंत्र्यानंतर कराडकर यांनी कामगार चळवळीत स्वत:ला झोकून दिले. साखर कामगार आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी लढा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कामगार चळवळ, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, आयुर्वेद, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात त्यांनी लोकहिताचा हेका घेऊन कोणताही अभिनिवेष न बाळगता कार्यरत राहणे पसंत केले. सांगली जिल्'ातील पुरोगामी चळवळीला बळ देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अखेरपर्यंत पुरोगामी कृतिशीलता जपली. अत्यंत साधी राहणी आणि कणखर विचार हे त्यांचे वैशिष्ट्य होय. सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, वाळव्याचा हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना, यशवंत सहकारी सिमेंट संस्था, शाहू इन्स्टिट्यूट या संस्थांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला होता. बलवडी येथील बळीराजा धरण उभारणीतही ते अग्रभागी होते. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत उद्या (बुधवारी) सकाळी ९ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.