शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून साईदर्शन इमारत कोसळली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 17:42 IST

घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

ठळक मुद्देसाईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे

मुंबई, दि. 25- घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनूसार,  साईदर्शन इमारतीमध्ये असलेल्या नर्सिंग होमने नुतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती, अनधिकृतपणे नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्यामुळे ही इमारत कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

विशेष म्हणजे ही इमारत 30 वर्ष जुनी होती. रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, अशीही प्राथमिक माहिती समोर येते आहे. इमारतीतील नियमबाह्य बदल तेथिल लोकांच्या जीवावर बेतल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. तर बीएमसीने कोणताही अहवाल दिला नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० ते 35 जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. या दुर्घटनेतील दोन जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, घटनेची माहिती कळताच अग्निशामकदलाचं पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांनी ही इमारत तीस ते चाळीसवर्ष जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला तसेच पालिकेकडून या इमारतीला नोटीस बजावण्यात आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दुर्घटनास्थळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असून, मदतकार्यामध्ये गुंतले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाडया, 108 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.  दरवर्षी पालिकेकडून पावसाळयात धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतही एक धोकादायक इमारत कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. दरवर्षी पावसाळयात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जुन्या जर्जर इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यात अनेक नागरीकांना प्राणास मुकावे लागते. इमारती रिकामी करण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावली जाते पण कोणतीही पर्याय व्यवस्था केली जात नसल्याने रहिवाशी आपला जीव मुठीत घालून त्या धोकादायक इमारतीमध्ये रहातात.