शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

... म्हणून साईदर्शन इमारत कोसळली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 3:02 PM

घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

ठळक मुद्देसाईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे

मुंबई, दि. 25- घाटकोपरमधील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. पण ही इमारत नेमकी का कोसळली? याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मूळ इमारतीच्या रचनेमध्ये काही अंतर्गत बदल केल्यामुळे इमारत कोसळली असावी, असा अंदाज गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनूसार,  साईदर्शन इमारतीमध्ये असलेल्या नर्सिंग होमने नुतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती, अनधिकृतपणे नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्यामुळे ही इमारत कोसळली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

विशेष म्हणजे ही इमारत 30 वर्ष जुनी होती. रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, अशीही प्राथमिक माहिती समोर येते आहे. इमारतीतील नियमबाह्य बदल तेथिल लोकांच्या जीवावर बेतल्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. तर बीएमसीने कोणताही अहवाल दिला नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० ते 35 जण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. या दुर्घटनेतील दोन जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, घटनेची माहिती कळताच अग्निशामकदलाचं पथक घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांनी ही इमारत तीस ते चाळीसवर्ष जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला तसेच पालिकेकडून या इमारतीला नोटीस बजावण्यात आल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दुर्घटनास्थळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले असून, मदतकार्यामध्ये गुंतले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाडया, 108 अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.  दरवर्षी पालिकेकडून पावसाळयात धोकादायक इमारतींना नोटीस बजावली जाते. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतही एक धोकादायक इमारत कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. दरवर्षी पावसाळयात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जुन्या जर्जर इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यात अनेक नागरीकांना प्राणास मुकावे लागते. इमारती रिकामी करण्यासाठी पालिकेकडून नोटीस बजावली जाते पण कोणतीही पर्याय व्यवस्था केली जात नसल्याने रहिवाशी आपला जीव मुठीत घालून त्या धोकादायक इमारतीमध्ये रहातात.