शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भर कोर्टात अश्विन नाईकवर गोळया झाडणा-या रवींद्र सावंतचा दयनीय शेवट

By admin | Updated: July 3, 2016 13:49 IST

अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड दरारा निर्माण करणारा कुख्यात शार्प शूटर रवी ऊर्फ रवींद्र शांताराम सावंत अखेरच्या दिवसात कमालीचा दयनीय जीवन जगला.

नरेश डोंगरे  

नागपूर, दि. ३ -  अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक याच्यावर कोर्टाच्या परिसरात दिवसाढवळ्या गोळी झाडून अवघ्या २२ व्या वर्षी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड दरारा निर्माण करणारा कुख्यात शार्प शूटर रवी ऊर्फ रवींद्र शांताराम सावंत अखेरच्या दिवसात कमालीचा दयनीय जीवन जगला. ज्याच्या गळ्यातील कधीकाळी रवी सावंत ताईत होता, तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सावंतच्या अखेरच्या दिवसात आसपासच (मध्यवर्ती कारागृहात) होता, अवतीभवती अनेक गुन्हेगार होते. 
 
मात्र, त्याच्यासोबत यापैकी प्रत्यक्ष, ना भाईजगत होते, ना कुणी आप्तस्वकीय. होय, शुक्रवारी दिवसभर छातीतील वेदनांनी तडफडून अखेर रवी सावंतने शुक्रवारी रात्री मेडिकलमध्ये प्राण सोडले. सावंतने जिवंतपणी अनेक गोष्टीसाठी जीवघेणी प्रतीक्षा अनुभवली. मृत्यूनंतरही त्याच्या वाट्याला नातेवाईकांची प्रतीक्षा आली आहे. 
 
मुंबई बॉम्बस्फोटानंतर मुंबईतून दाऊद कराचीत पळून गेला तर, छोटा राजनने मलेशियात हातपाय पसरले. त्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये सर्वाधिक प्रभाव डॉन अरुण गवळीच्या टोळीचा होता. त्याला काटशह देण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमर नाईकच्या टोळीला धडा शिकवण्याचा कट गवळी टोळीने रचला. 
 
त्यानुसार, १० एप्रिल १९९४ ला गवळी टोळीचा शूटर रवींद्र सावंत याने कोर्टाच्या परिसरात शिरून अमर नाईकचा भाऊ अश्विन नाईक याच्यावर गोळी झाडली. डोक्याला मागच्या बाजूने गोळी लागल्याने अश्विन या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. सोबतच त्याच्या बाजूला असलेले तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.
 
वकिलाच्या वेशात केला होता हल्ला 
वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार, अश्विनचा गेम करण्यासाठी कुख्यात सावंत वकिलासारखा वेश परिधान करून कोर्टाच्या आवारात शिरला होता. या घटनेमुळे अंडरवर्ल्डसह देशभरात खळबळ उडाली होती. सावंतने झाडलेली गोळी डोक्यातून आरपार निघूनही  अश्विन वाचला. मात्र, त्याच्या कंबरेखालचा भाग अधू झाला होता. नाईक टोळीही बॅकफूटवर गेली होती. या हल्ल्यामुळे गवळी टोळीसोबत अवघ्या २२ वर्षांच्या रवींद्र सावंतचीही दहशत तीव्र झाली होती. मोठमोठे गुन्हेगारही आता सावंतच्या नावाने थरथरत होते. त्यामुळे त्याच्यावर टाडा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कोर्टात जलदगतीने प्रकरण चालविण्यात आले. ७ सप्टेंबर १९९६ ला या गुन्ह्यात सावंतला कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी तो केवळ २४ वर्षांचा होता. 
 
त्यावेळी कारागृहांमध्येही अंडरवर्ल्ड टोळ्यांच्या गुंडांमध्ये धुसफूस अन् हल्ले सुरूच होते. त्यामुळे १९ सप्टेंबरला सावंतला नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. अंडरवर्ल्ड अन् अय्याशीच्या जीवनाची चटक असलेल्या सावंतला प्रारंभी आतल्या आत बºयापैकी रसद मिळत असल्याने त्याने १४ वर्षे कारागृहात काढली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करून आपण १४ वर्षे शिक्षा भोगल्यामुळे आता मुक्त करण्यात यावे, अशी याचिकेतून मागणी केली. मात्र, त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप बघता कोर्टाने त्याची ही याचिका फेटाळून लावली. तेव्हापासून सावंत कमालीचा निराश झाला होता.
  
येथील मध्यवर्ती कारागृहात मुंबईतील अनेक खतरनाक टोळ्यांमधील गुंड बंदिस्त आहेत. सावंत ज्याच्या गळ्यातील कधीकाळी ताईत होता, तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी) सुद्धा गेल्या तीन-चार वर्षांपासून याच कारागृहात बंदिस्त आहे. मात्र, सावंतला (बंदी क्र. सी-४७४०) टशन, भाईगिरीचा विसर पडल्यासारखाच झाला होता. कारागृहाच्या सूत्रांनुसार, त्याची अलीकडे विड्यांच्या थोटकांसाठीही मारामार होती. त्याची बाहेर जाण्यासाठी नुसती खटपट सुरू होती. 
 
ठराविक कारणे सांगून तो फर्लो आणि पॅरोलवर (संचित रजेवर) मुंबईला आपल्या जोगेश्वरी (पूर्व) तील  एमएचबी कॉलनी, मेघवाडीत जायचा. दोन महिन्यांपूर्वीच तो मुंबईला जाऊन आला होता.  कारागृहाच्या अधिका-यांनुसार, फुफ्फुसाचा विकार जडलेल्या सावंतला आपल्या नातेवाईकांची नेहमीच प्रतीक्षा असायची. २० वर्षांपासून कारागृहात बंदिस्त असल्याने तो खटपट करत होता. कारागृहातून कधी एकदा आपल्याला कायमची सुटी मिळते, असे त्याला झाले होते. मात्र शिक्षेतून मुक्ती मिळण्याऐवजी त्याला जीवनातून कायमचीच मुक्ती मिळाली. शुक्रवारी सकाळपासून छातीत दुखत होते. 
 
रात्री ७ वाजता प्रकृती खालावल्याने त्याला कारागृहातून मेडिकलमध्ये नेण्यात आले. मात्र, रात्री ९ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. त्याचे नातेवाईक अद्याप नागपुरात आले नाही. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तसाच पडून आहे. एका चालत्याबोलत्या थराराचा असा भयावह आणि दयनीय शेवट गुन्हेगारांना धडकी भरविणारा आहे.