शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Election 2019; पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं अन् पवारांनी साधलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 10:33 AM

भर पावसात भाषण केल्यामुळे शरद पवारांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

-मोसीन शेख 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली. त्यांची ही सभा सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला असून, पवारांच्या सभेचे फोटो चांगलेचं व्हायरल होत आहेत. मात्र मागील आठवड्यात राज्याचे लक्ष लागलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसाच्या खेळामुळे रद्द झाली होती. त्यामुळे पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं अन् पवारांनी साधलं, अशी चर्चा पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने गेल्या दोन-तीन दिवसात राजकीय नेत्यांनी आपल्या सभांचा धडाकाच लावला आहे. मात्र परतीच्या पावसाचा फटका निवडणुकीच्या या प्रचारसभांनाही बसत असल्याचं दिसत आहे. शुक्रवारी शरद पावर यांची साताऱ्यात सभा सुरु असताना अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे एकच धावपळ सूर झाली होती. मात्र वरून धो-धो पाऊस सुरु असताना सुद्धा पवारांनी आपले भाषण सुरुचं ठेवले. पवार हे आपले भाषण आटोपतं घेतील आणि निघून जातील असे सर्वाना वाटत होते. मात्र पवारांनी आपलं झंजावती भाषण सुरूच ठेवले. भर पावसात भाषण केल्यामुळे शरद पवारांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

मात्र दुसरीकडे आता यावरूनच राज ठाकरेंच्या पुण्यातील रद्द झालेली सभेची सुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज यांची पहिली सभा गेल्या आठवड्यात पुण्यात होणार होती. ईडीच्या चौकशीनंतर ते पहिल्यांदाचं जाहीर सभा घेत असल्याने, ते काय बोलणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने ही सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राज यांच्या भाषणाकडे लक्ष लागलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असल्याचे पहायला मिळाले. त्यात शुक्रवारी पवारांची भर सभेत झालेली सभामुळे, पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं अन् पवारांनी साधलं असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान वयाच्या ७९ व्या वर्षीही शरद पवार हे निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं. त्यामुळे तरुण पिढी पवारांच्या पावसातील भाषणाची दाद देतेय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात पवारांची ही सभा राष्ट्रवादीला नवसंजीवनी देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.