शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:05 IST

गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही. पण तरीही लोकसभेच्या दोन जागा, तीन जागा मागितल्याच्या बातम्या देत होते.

मुंबई : राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर त्यांना फोन करून विचारले कुठे भेटुयात; भेटलो आणि जाब विचारला. तुम्हाला कधी भेटलो, पक्षाचा कोणता नेता बोलला का? कधी सीट मागितल्या का? नाही म्हणाले. यानंतर अशोक चव्हाणांनाही विचारले. जर नाही तर मग तुम्ही माध्यमांसमोर का बोलत सुटलात? असा जाब विचारल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची रंगशारदा सभागृहामध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याच्या निर्णयावर खुलासा केला. तसेच गेल्या काही दिवसांत आलेल्या अफवांवरही भाष्य केले. गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही. पण तरीही लोकसभेच्या दोन जागा, तीन जागा मागितल्याच्या बातम्या देत होते. माझा पाडवा मेळावा आठवा, मी म्हणालो होतो देशातील सर्व पक्षांनी मोदी आणि शाह ह्यांच्या विरोधात एकत्र यायला हवं. मग मी का घाबरेन? काँग्रेस, राष्ट्रवादीकडून वक्तव्ये यायला सुरु झाली. कोणी म्हणते अवैध, कोणी म्हणे चुकीचे. शरद पवार भेटले. विमानतच भेटले. जमिनीवरच्या चर्चा हवेत करायच्या असतात का. औरंगाबादला गेलेलो, तेही तेथे होते. मागे येताना एकाच विमानात असल्याचे कळले. आता बोलायचे नाही का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

यावरून राष्ट्रवादीसोबत जाण्याची चर्चा. काँगेसचे नेते बोलले. मग अजित पवार बोलल्यावर मात्र त्यांना फोन केला, विचारले कुठे भेटता येईल. भेटलो. त्यांना विचारले मी कधी बोललो? आमच्यापैकी कोणी भेटला? तर नाही. मग पत्रकार काहीही गोष्टी विचारतात त्याची उत्तरे कशी देता असे विचारले. मी लोकसभा लढणार नाही हे आधीच सांगितले आहे. जो निर्णय घेईन तो तुमच्या फायद्याचा असेल, असे राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

Raj Thackeray: अजित पवारांना भेटलो, अशोक चव्हाणांशी बोललो, पण...; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

ही निवडणूक मोदी आणि शहा यांच्या विरोधात देश अशी आहे. यापुढील सभा या केवळ यांच्या विरोधात असतील. आता काय चौकीदार, भारतातल्या निवडणूका लढवताय की नेपाळच्या, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान एवढ्या खालच्या विचारांचा असेल असे वाटले नाही. काय तर म्हण चौकीदार, या भानगडीत पडू नका. ही मोहीम ट्रॅप आहे. गेल्या साडे चार वर्षातील अपयश झाकण्यासाठी हे सुरु केले आहे. सावध व्हा. 

कार्यकर्ते, मतदारांना आदेश

याच्या पुढची भाषणे करेन किंवा तुम्ही जे काही कराल ते भाजपाच्या विरोधात करायचे. हेच तुमचे पक्षासाठी योगदान असेल. देश एका मानसाच्या मोठ्या संकटामध्ये आहे. भाजपवाले थैल्या रिकाम्या करतील. केल्या तर घ्या, हीच त्यांना लुटायची वेळ आहे. त्यांनी गेली पाच वर्षे देश लुटला. ही निवडणूक पक्षाची नाही. भाजप पक्ष म्हणून अंतर्गत खूप त्रस्त आहे. ही दोन माणसे जेव्हा बाजुला होतील त्यानंतरची लढाई ही खरी पक्षांमधील असेल, असेही राज ठाकरे म्हणाले. 

 

 

 

Raj Thackeray: भाजपाच्या, मोदींच्या विरोधात काम करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारAshok Chavanअशोक चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेस