शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धरणक्षेत्राकडे पावसाची पाठ

By admin | Updated: September 19, 2015 03:34 IST

विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील

मुंबई : विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील पाण्याची पातळी अद्यापही वाढत नसल्याने भविष्यात मुंबईतील २० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे चित्र आहे.पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करायचा असेल तर १ आॅक्टोबर रोजी सातही तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लीटर्स पाणी असणे आवश्यक आहे. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी तलावातील पाण्याने १० लाख दशलक्ष लीटर्सचीही पातळी गाठलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सातही तलावांत एकूण ९ लाख ९४ हजार १५२ दशलक्ष लीटर्स पाण्याच्या पातळीची नोंद झाली आहे. हा जलसाठा १२ लाख दशलक्ष लीटर्स झाला तरी मुंबईकरांना भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.परंतु राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना मागील २४ तासांत या तलाव क्षेत्रांत मात्र पावसाची नाममात्र नोंद झाली आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोडक सागर, तानसा, विहार, अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा क्षेत्रात पावसाची नोंदच झालेली नाही; तर तुलसी तलाव क्षेत्रात २ मिलिमीटर आणि भातसा तलाव क्षेत्रात १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरातही केवळ ढग दाटून येत असून, पावसाने उघडीपच घेतली आहे. गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरीही पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या वारंवार सरी कोसळतील; तर काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (प्रतिनिधी)