शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:45 IST

पालघरमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलींची विक्री होत असल्याची तक्रार राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

CM Devendra Fadnavis: मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक सामाजिक समस्या समोर आली आहे. जेथे मुलींनी खेळायला, शाळेत जायला हवे, त्या कोवळ्या वयात त्यांची केवळ काही हजार रुपयांसाठी विक्री केली जात आहे. अल्पवयीन आदिवासी मुलींना लग्नाच्या नावाखाली विकण्याचा हा भयावह प्रकार उघडकीस आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केले आहे.

नोकरी नसलेल्या तरुणांसाठी काही एजंट्स पालघरच्या आदिवासी पाड्यांमध्ये सक्रिय झाले आहेत. हे एजंट नवरदेवाकडून लाखो रुपयांची मोठी रक्कम घेतात. याच एजंट्सकडून पालघरमधील गरीब आदिवासी कुटुंबांना केवळ ४०,००० ते ५०,००० देऊन त्यांच्या मुलींचा सौदा केला जातो. मुलगा चांगला कमवतो आणि तुमची मुलगी सुखी होईल,' अशी खोटी आश्वासने देऊन अशिक्षित आदिवासी कुटुंबांची फसवणूक केली जाते. दारिद्र्यामुळे हतबल झालेले पालक आपली मुलगी कोणाला देत आहेत, तिचा नवरा कुठे राहतो, याची साधी चौकशीही करत नाहीत. एजंट्स केवळ लग्ने लावून देतात आणि त्यानंतर त्या मुलींच्या भविष्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

या प्रकरणांची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली आहे. आरोपींसह या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या एजंट्सना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे.

बेपत्ता मुलांच्या वाढत्या संख्येवर राज ठाकरे संतप्त

पालघरमधील या विक्रिसत्राच्या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात लहान मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र लिहून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या आकडेवारीनुसार, सन २०२१ ते २०२४ या काळात लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहे, या वस्तुस्थितीकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले आकडेवारीसह उत्तर

राज ठाकरे यांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्र सविस्तर वाचले नसले तरी, बेपत्ता मुलींच्या आकडेवारीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी अजून पत्र वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींसंदर्भात आकडेवारी सहित त्याची कारणं दिली आहेत. परत किती येतात हेही सांगितलेलं आहे. एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि ती तीन दिवसांत परत आली तरी तिची बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवली जाते. यामुळे बेपत्ता झालेल्यांची संख्या मोठी दिसते. आम्ही वर्षभरात ९० टक्क्यांहून अधिक मुलींना परत आणण्यात यशस्वी होतो. उर्वरित मुली पुढील वर्ष-दीड वर्षात परत येतात," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पत्र वाचल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेला योग्य उत्तर देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Child Marriage Racket Exposed in Palghar; CM Responds to Thackeray's Letter

Web Summary : A child marriage racket in Palghar, where minor tribal girls are sold for meager sums, has been exposed. Raj Thackeray raised concerns about missing children. CM Fadnavis stated 90% of missing girls are recovered annually, clarifying the statistics and addressing Thackeray's letter.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेpalgharपालघर