शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: विरोधकांचा सरकारवर घणाघात; शिवसेना नेतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ऐकत नसतील, तर मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 10:26 IST

Corona Virus: खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे खासदार या आवाहनाला प्रतिसाद देत नसतील तर ते दुर्दैवी आहे

ठळक मुद्देगर्दीच्या ठिकाणी एकत्र जमू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लोकांना सूचना पक्षाचे खासदार या आवाहनाला प्रतिसाद देत नसतील तर ते दुर्दैवी - प्रविण दरेकर

मुंबई - देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर महाराष्ट्रात या व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत राज्यात ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औंरगाबाद, ठाणे, अहमदनगर अशा ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापूरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी म्हणून शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नये असंही सांगण्यात आलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला केराची टोपली दाखवण्याचं काम शिवसेनेच्या नेत्यांकडून केलं जात आहे. 

शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांना उद्धव ठाकरे यांनी 15 दिवस नागरिक, मतदार किंवा लोकांचा जमाव एकत्र येऊन जमा होतील, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला. मात्र, शिवेसनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्त्वाच्या आदेशाला हरताळ फासलं आहे यावरुन विरोधकांनी सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 

खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे खासदार या आवाहनाला प्रतिसाद देत नसतील तर ते दुर्दैवी आहे. पक्षातील नेतेच ऐकत नसतील तर बाकीच्यांनी काय करायचं? या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी काळजी घ्यायला हवी. शिवसेनेकडून कार्यक्रमाचे आयोजन केले जात असेल तर पक्ष आणि सरकारमध्ये विसंगती असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत, त्यामुळे पक्षात त्यांचे ऐकलं जात नाही का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.  

नगर जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही शिर्डीत साई परिक्रमा काढण्यात आली होती. या साई परिक्रमेत ग्रामस्थ तसेच देशभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते. 14 किलोमीटर अंतर पार करत साई परिक्रमा यात्रा द्वारकामाई मंदिरापर्यंत आल्यानंतर समाप्त झाली. विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे या परिक्रमेत सहभागी झाल्याचे दिसून आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करूनही त्याची पर्वा न करता सदाशिव लोखंडे यांनी साई परिक्रमेला उपस्थिती दर्शवली होती. तसेच ठाण्यातही शिवसेना नेत्यांकडून मिसळ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

मात्र शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांना परिक्रमेच्या शुभारंभ आणि सांगतेला उपस्थित नव्हतो. तर शिर्डीत असताना मॉर्निंग वॉकला जात असतो. रविवारी मोर्निंग वॉक करताना रस्त्यात परिक्रमावासीय भेटले, त्यांच्याशी चालतांना संवाद साधला असा दावा त्यांनी केला आहे. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPraveen Darekarप्रवीण दरेकर