शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
3
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
4
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
5
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
6
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
7
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
8
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
9
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
10
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
11
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
12
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
13
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
14
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
15
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
16
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
17
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
18
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
19
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

खुल्या प्रवर्गातील पूर्वीच्या जागा टिकविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 5:10 AM

मुख्यमंत्र्यांची ग्वाही; देशातील एकूण रोजगाराच्या २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध समाजघटकांना आरक्षण दिल्याने खुल्या प्रवर्गातील जागांवर गदा आली असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, ‘खुल्या प्रवर्गांसाठी २०१८ पूर्वी असलेल्या जागा कोणत्याही परिस्थितीत टिकविल्या जातील’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

भाजपचा निवडणूक संकल्पनामा जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जेवढ्या जागा २०१८ पूर्वी खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध होत्या तेवढ्या नक्कीच कायम राहतील आणि भविष्यात त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल. एखाद्या समाजघटकाला आरक्षण देताना खुल्या प्रवर्गावर आपले सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन फडणवीस सरकारला लक्ष्य बनविले आहे. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही पारदर्शक कर्जमाफी दिली. आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफीत झालेले घोटाळे कॅगच्या अहवालात आले आहेतच. सरकारमधील लोकांशी संबंधित संस्थांची कर्जे त्या निमित्ताने माफ केली. त्यांच्या काळात विदर्भाला दिलेली कर्जमाफी आम्ही एका जिल्ह्याला दिली. मराठवाड्याबाबतही तसेच घडले. विरोधकांजवळ खरेतर सांगण्यासारखे काहीही नाही. त्यांनी एक बोट आमच्याकडे दाखविले की चार बोटे त्यांच्याकडे असतात.

देशातील एकूण रोजगाराच्या २५ टक्के रोजगार हे गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत.त्यांच्या काळात किती रोजगार निर्माण झाले हे त्यांनी सांगावे.

कलम ३७० मुळे त्यांना चिमटासंपूर्ण देश काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासाठी एकसंध झाला होता. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला विरोध केला. कलम ३७० चा मुद्दा आम्ही काढला की यांचा तो चेहरा उघडा पडतो. पण यांना कितीही चिमटे बसले तरी आम्ही प्रचारात ३७० चा मुद्दा काढणारच, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.पीएमसी बँकेसाठी पंतप्रधानांना भेटणारनिर्बंध घालण्यात आलेल्या पीएमसी बँकेतील ठेवीदारांना त्यांचा सगळा पैसा परत मिळावा यासाठी आपण पंतप्रधान, केंद्रीय वित्त मंत्र्यांची लवकरच भेट घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बँकेचेप्रकरण रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित असले तरी संपत्ती जप्त करण्यापासून अटकेपर्यंतची कारवाई ईडीने केलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस