शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी

By admin | Updated: July 25, 2014 01:30 IST

सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल़ पक्षाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून आघाडी होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी ठणकावून सांगितले.

पुणो : सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल़ पक्षाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून आघाडी होणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी ठणकावून सांगितले. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसची 144 जागांची मागणी कदापिही मान्य करणार नाही. कार्यकत्र्यानी 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे पश्चिम महाराष्ट्र विभागाचा संकल्प मेळावा गुरुवारी पुण्यात झाला़ या वेळी आघाडी करू नये, असा बहुतांश जिल्हाध्यक्षांचा सूर होता. मेळाव्याला राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, स्वराज वाल्मीकी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, वनमंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित होत़े
मुख्यमंत्री म्हणाले, भाजपाने मूळ प्रश्नांना बगल देऊन नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लोकांना भुरळ पाडली आहे. देशाने गेल्या 1क् वर्षात मोठी प्रगती केली़ आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आह़े महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेर्पयत पोहोचविणार आह़े आजही महाराष्ट्र सर्व बाबतींत अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आह़े दुष्काळात शासन ताकदीने शेतक:यांच्या मागे उभा राहिला़, असे ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले,  राष्ट्रवादी कॉँग्रेसने  144 जागांची मागणी केली आह़े आपली ताकद वाढल्याचे ते सांगत आहेत. मात्र, आमच्या भरवशावरच शक्ती वाढली़ मागील लोकसभेच्या वेळी कॉँग्रेसने 26पैकी 17 जागा जिंकल्या होत्या़ विधानसभेतही आमच्या 1क् जागा वाढल्या तर त्यांच्या 12 जागा कमी झाल्या़ जागावाटप करताना मागील कामगिरीचा  विचार केला पाहिज़े त्यांची मागणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही़ कार्यकत्र्यानी 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवायला हवी. 
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 8 ते 9 महिने घरोघरी जाऊन वेगळा प्रचार करीत होत़े आपल्यातले मतभेद विसरून सर्वानी काँग्रेसबरोबर राहिले पाहिज़े ब:याच गोष्टी हायकमांडवर सोडून चालणार नाही़ काही निर्णय आपण घेतले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकत्र्याचा विचार ऐकला़ विदर्भ, मराठवाडा, खानदेशमधील कार्यकत्र्याचा विचार ऐकून घेतल्यानंतर निर्णय होईल़ पण जो काही निर्णय घ्यायचा तो 15 - 2क् दिवसांत घेतला पाहिजे.