शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

आतापर्यंत ५० टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप; व्यापारी बँकांच्या आडमुठेपणामुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 2:11 AM

जिल्हा बँकांची मात्र भूमिपुत्रांना चांगली साथ

- विशेष प्रतिनिधीमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सक्त इशारा देऊनही राष्ट्रीयकृत आणि खासगी अशा व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्जवाटप करण्यासंदर्भात आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवल्याने आतापर्यंत राज्यातील केवळ ५० टक्केच शेतकºयांना खरीप हंगामाचे कृषीकर्ज वाटप होऊ शकले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी मात्र तत्परता दाखवत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेआहे.खरीप हंगामाचे कर्जवाटप १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३० सप्टेंबरला संपते. मात्र, पिकांचा हंगाम लक्षात घेता बहुतांश पीकवाटप हे जुलैअखेर करणे अपेक्षित असते. आज ९ ऑगस्ट आला तरी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्केही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम पडलेली नाही.यंदा व्यापारी बँकांना ३२ हजार ५१७ कोटी रु.कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील केवळ ११ हजार १९६ कोटी रुपयांचे म्हणजे ३४.४३ टक्केच वाटप करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना १३ हजार २६९ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना त्यांनी ११ हजार ५७४ कोटी रुपयांचे म्हणजे ८७.२२ टक्के कर्जवाटप केले. जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी एकत्रितपणे केलेल्या कर्जवाटपाची टक्केवारी ५० आहे पण त्यात सिंहाचा वाटा हा जिल्हा बँकांचा आहे.सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यापारी बँकांना कर्जवाटप वाढविण्याच्या स्पष्ट सूचना पुन्हा एकदा दिल्या आहेत. तसेच त्यांनी कर्जवाटपात मागे असलेल्या १४ जिल्हा बँकांची अलिकडेच बैठक घेतली.गेल्या वर्षीपेक्षा ८ लाख शेतकरी संख्या वाढलीकर्जवाटपाचे ५० टक्केच उद्दिष्ट साध्य झाले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत कर्जाचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८ लाख ६ हजाराने वाढली आहे. यंदा आतापर्यंत जिल्हा बँकांनी २१.३३ लाख शेतकºयांना तर व्यापारी बँकांनी ८.८७ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जवाटप केले. गेल्यावर्षी आतापर्यंत २२ लाख १४ हजार शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी