शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
6
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
7
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
8
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
9
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
10
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
11
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
12
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
13
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
14
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
15
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
16
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
17
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
18
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
19
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
20
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ५० टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप; व्यापारी बँकांच्या आडमुठेपणामुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:48 IST

जिल्हा बँकांची मात्र भूमिपुत्रांना चांगली साथ

- विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सक्त इशारा देऊनही राष्ट्रीयकृत आणि खासगी अशा व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे कर्जवाटप करण्यासंदर्भात आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवल्याने आतापर्यंत राज्यातील केवळ ५० टक्केच शेतकºयांना खरीप हंगामाचे कृषीकर्ज वाटप होऊ शकले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी मात्र तत्परता दाखवत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले
आहे.

खरीप हंगामाचे कर्जवाटप १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३० सप्टेंबरला संपते. मात्र, पिकांचा हंगाम लक्षात घेता बहुतांश पीकवाटप हे जुलैअखेर करणे अपेक्षित असते. आज ९ ऑगस्ट आला तरी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्केही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम पडलेली नाही.
यंदा व्यापारी बँकांना ३२ हजार ५१७ कोटी रु.कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील केवळ ११ हजार १९६ कोटी रुपयांचे म्हणजे ३४.४३ टक्केच वाटप करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना १३ हजार २६९ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना त्यांनी ११ हजार ५७४ कोटी रुपयांचे म्हणजे ८७.२२ टक्के कर्जवाटप केले. जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी एकत्रितपणे केलेल्या कर्जवाटपाची टक्केवारी ५० आहे पण त्यात सिंहाचा वाटा हा जिल्हा बँकांचा आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यापारी बँकांना कर्जवाटप वाढविण्याच्या स्पष्ट सूचना पुन्हा एकदा दिल्या आहेत. तसेच त्यांनी कर्जवाटपात मागे असलेल्या १४ जिल्हा बँकांची अलिकडेच बैठक घेतली.

गेल्या वर्षीपेक्षा ८ लाख शेतकरी संख्या वाढली
कर्जवाटपाचे ५० टक्केच उद्दिष्ट साध्य झाले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत कर्जाचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८ लाख ६ हजाराने वाढली आहे. यंदा आतापर्यंत जिल्हा बँकांनी २१.३३ लाख शेतकºयांना तर व्यापारी बँकांनी ८.८७ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जवाटप केले. गेल्यावर्षी आतापर्यंत २२ लाख १४ हजार शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी