अन्नधान्य उत्पादनात 10 वर्षात केवळ 4.93 लाख टन वाढ
By Admin | Updated: September 18, 2014 01:44 IST2014-09-18T01:44:29+5:302014-09-18T01:44:29+5:30
शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दरवर्षीच्या ओल्या किंवा कोरडय़ा दुष्काळामुळे शासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत.

अन्नधान्य उत्पादनात 10 वर्षात केवळ 4.93 लाख टन वाढ
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दरवर्षीच्या ओल्या किंवा कोरडय़ा दुष्काळामुळे शासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत. गेल्या दहा वर्षात राज्यात अन्नधान्याच्या उत्पादनात केवळ 4.93 दशलक्ष टन अशी नाममात्र वाढ झाली आहे.
गतवर्षी ओल्या दुष्काळामुळे शेकडो हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. अनेकांची शेती खरडून गेली. तर यावर्षी अत्यल्प पावसामुळे अनेकांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शासनाने काही तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम उत्पादनावर झाला असून शासनाच्या प्रयत्नानंतरही उत्पादन वाढले नाही.
शेती पिकांचे उत्पादन वाढून शेतक:यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. राज्यात 7 नव्या बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील 3क्2 बाजार समित्यांच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल 46 हजार 286 कोटीवर पोहोचली आहे. ही उलाढाल यापूर्वी 38 हजार 743 कोटींवर होती. उत्पादन वाढीसाठी दरवर्षी 73 लाख मेट्रीक टन खताचा वापर होतो. मात्र काळ्याबाजारामुळे शेतक:यांना वेळेवर खत मिळत नाही. याची दखल घेत शासनाने शेतक:यांचे गट तयार करुन बांधावर खत पुरविण्याची योजना सुरु केली. मात्र, ही योजना किचकट असल्याने शेतक:यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. उत्पादन खर्चावर आधारित आधारभूत किं मत योजनाही फसली असून ग्रामीण भागात व्यापारी शेतक:यांची आर्थिक लूट करीत आहेत.
च्483 टक्के कोरडवाहू क्षेत्रची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कोरडवाहू शेती अभियान सुरु करण्यात आले. या अभियानासाठी पाच वर्षात दहा हजार कोटींची गुतंवणूक करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला. तसेच सेंद्रिय शेती धोरणाची आखणी करुन 2क्क्8-क्9 ला कीड व रोग सव्रेक्षण प्रकल्प स्थापन करण्यात आले.
च्या प्रकल्पाच्या माध्यमातून बांधावर जाऊन शेतपिकांचे सव्रेक्षण करणो, रोगाची माहिती शेतक:यांर्पयत पोहोचवून त्यावर उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन ग्रामपंचायतस्तरावर सुरु केले. मात्र, सद्यस्थितीत कोणत्याही ग्रामपंचायतीत कीड व रोग व्यवस्थापनाबाबत माहिती मिळत नाही.