शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे वाटोळे !

By admin | Updated: July 4, 2014 06:15 IST

कोणतीही पर्यायी व्यवस्था व हमीभाव न देता बाजार समितीच्या कायद्यातून मुक्तता करत कांदा-बटाट्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने महागाईवर नियंत्रण येईल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे

योगेश बिडवई , मुंबई
कोणतीही पर्यायी व्यवस्था व हमीभाव न देता बाजार समितीच्या कायद्यातून मुक्तता करत कांदा-बटाट्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने महागाईवर नियंत्रण येईल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. शहरी मतदारांवर डोळा ठेवून सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
बाजार समिती कायद्यातून कांदा मुक्त करून त्याची खुल्या बाजारात विक्री करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र त्याबाबतचे आदेश राज्याच्या पणन विभागाला गुरुवारी संध्याकाळपर्यंत मिळालेले नव्हते. पणन विभागाच्या कार्यालयात विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यालयातून फोन येत होते.
फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले. आता अपुऱ्या पावसामुळे कांद्याची नव्याने लागवड झालेली नाही. मात्र देशभर कांदा पोहोचविण्याची सरकारी व्यवस्था अधिक मजबूत करण्यापेक्षा किमान निर्यात मूल्य प्रतिटनामागे ५०० डॉलर करणे आणि बाजार समितीच्या कायद्यातून कांदा मुक्त करण्याने त्याचे दर कमी होतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कांदा बाजार समितीत नाही विकायचा मग कोठे विकायचा, असा सवाल चांदवडचे शेतकरी प्रकाश जाधव यांनी केला आहे. ते म्हणाले, व्यापारी बांधावर आमचा कांदा खरेदी करतील, पण आम्हाला पूर्ण दाम देण्याची हमी कोण देणार? पैसे बुडल्यास कोणाकडे दाद मागायची. यासाठी काही पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे का? कांदा मुक्त करणे म्हणजे केवळ फुकाच्या गप्पा आहेत, असेही जाधव म्हणाले.
गेल्या वर्षीपर्यंत १२०० रुपये किलो असणारे कांद्याचे बियाणे आता ३,५०० रुपयांवर गेले आहे. खते, औषधांचे दर तिप्पट झाले. पेट्रोल, डिझेल महागले आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव चार पैशाने वाढले असतील, तर एवढा गदारोळ का, असा सवाल निफाडचे कांदा उत्पादक जनार्दन जगताप यांनी केला.