शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेकडील थंडीने रेल्वे सहल ‘गारठली’

By admin | Updated: December 27, 2014 04:37 IST

रशियन करन्सीचा भाव खाली उतरल्यामुळे तब्बल १० हजार रशियन पर्यटकांनी गोव्यातून माघार घेतली आणि यामुळे गोवा

मुंबई : रशियन करन्सीचा भाव खाली उतरल्यामुळे तब्बल १० हजार रशियन पर्यटकांनी गोव्यातून माघार घेतली आणि यामुळे गोवा येथील सर्व हॉटेल्स रिकामी झाली. त्याचा फायदा घेत २९ डिसेंबरपासून चार दिवसांची मुंबई-गोवा टूर पॅकेज आयआरसीटीसीने आखली. उत्तर भारतात पडलेली थंडी आणि या थंडीमुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांनी गोव्याला दिलेली पसंती पाहता गोवा येथील सर्व हॉटेल्स भरली. त्यामुळे आयआरसीटीसीला एकही हॉटेल उपलब्ध न झाल्याने आयोजित मुंबई-गोवा टूर पॅकेजच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची सर्व जबाबदारी मध्य रेल्वेवर टाकली आहे. त्यामुळे रेल्वे आता पॅकेज टूरमधील ट्रेनच चालवण्याचा विचार करत असून तीदेखील प्रिमियम म्हणून चालवण्याचा विचार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नवीन वर्षाच्या स्वागताला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग टूरिझम कॉर्पोरेशन) २९ डिसेंबरपासून चार दिवसांची मुंबई-गोवा टूर पॅकेज आखली होती. यासाठी सीएसटी, पनवेल, गोवा आणि पुन्हा त्याच ट्रेनने परत येतानाच गोव्यातील हॉटेल्स बुक करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला. त्याचप्रमाणे या पॅकेजमध्ये हॉटेल, चर्च, बीचही दाखवणार होते. प्रत्येक माणसामागे वर्गवारीनुसार (कॅटेगरी) शुल्क आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. स्टॅण्डर्ड कॅटेगरी पाहिजे असल्यास १२,९९९ रुपये, कम्फर्टसाठी १८,९९९ रुपये आणि डिलक्ससाठी २२ हजार ९९९ रुपये आकारणी केली जाणार होती. यासाठी सर्व तयारी करतानाच त्याचे प्रसिद्धिपत्रकही आयआरसीटीसीने काढले. मात्र अचानक या टूर पॅकेजमधून माघार घेण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेला सांगण्यात आले. त्यामुळे आता ही टूर पॅकेज रद्द करून फक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नवीन वर्षाच्या निमित्ताने गोव्यात जवळपास १० हजार रशियन पर्यटक उपस्थिती लावणार असल्यामुळे सर्व हॉटेल्स, बीच हाऊसफुल्लच झाली होती. मात्र ऐनवेळी रशियन करन्सीचा भाव उतरल्यामुळे सर्वच्या सर्व पर्यटकांनी त्यातून माघार घेतली. त्यामुळे याचा फायदा उचलत गोवा टूरिझम आणि आयआरसीटीसीने मुंबई-गोवा पॅकेज टूरचा निर्णय घेतला होता. मात्र उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडल्यामुळे तेथील पर्यटकांना येण्यास सरकारकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्याला पसंती दिल्याने सर्व हॉटेल्सचा भाव वधारला आणि आयआरसीटीसीला मिळणारी हॉटेल्स ही उत्तर भारतीय पर्यटकांना देण्यात आली. एकही हॉटेल न मिळाल्याने हे टूरपॅकेज रद्द करण्यात आले. (प्रतिनिधी)