शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गयारामांना ‘नो एन्ट्री’! शरद पवारांची भूमिका; पद्मसिंहांचे नाव निघताच जोडले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 09:10 IST

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खा. पवार सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे.

उस्मानाबाद : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता परत पक्षात घेणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खा. पवार सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काहींच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय. आता त्यांना पुन्हा घेणे नाही. ‘गेलात तिथे सुखी रहा’, असे सांगतोय़ उस्मानाबादच्या बाबतीत हाच निर्णय घेतल्याचे सांगून पद्मसिंह यांच्या कुटूंबास आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचे पवार यांनी त्यांचे नाव न घेता सांगितले. शिवाय डॉ. पाटील यांचे नाव निघताच त्यांनी कोपरापासून हात जोडले!

डॉ. पद्मसिंह पाटील हे पवारांचे जवळचे नातलग आहेत. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. राणा जगजितसिंह हे अजित पवारांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा होती. मात्र खा. पवारांच्या आजच्या विधानाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

एकनाथ खडसेंच्या पक्षांतरावर टाळले भाष्य -भाजप नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेत. विरोधी पक्षनेते म्हणून ते प्रभावी होते. विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. याची नोंद पक्ष घेत नाही, असे खडसेंना वाटत असेल. तसेच दुसरा पक्ष त्याची नोंद घेतो असेही त्यांना वाटले असेल, इतकेच बोलून खडसेंच्या पक्षांतरावरील वावड्यावर पवारांनी पूर्ण भाष्य करणे टाळले.

या नेत्यांनी सोडला पक्ष : विधानसभा निवडणुकीपूर्वी -जयदत्त क्षीरसागर, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, र्वैभव पिचड, राणा जगजितसिंह पाटील, संदीप नाईक, सचिन अहिर आदी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून इतर पक्षात प्रवेश केला आहे. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी