शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादीने कॉँग्रेसचा केवळ फायदा घेतला’

By admin | Updated: July 25, 2014 01:32 IST

लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने प्रामाणिकपणो काम केले म्हणूनच राष्ट्रवादीचे चारपैकी दोन खासदार निवडून आल़े पण याचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसचा फायदा घेतला़

पुणो : लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने प्रामाणिकपणो काम केले म्हणूनच राष्ट्रवादीचे चारपैकी दोन खासदार निवडून आल़े पण याचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसचा फायदा घेतला़ आघाडीमुळेच काँग्रेस कमकुवत होत आहे, याचा वेळीच विचार करा़ ते 144 जागा मागत आहेत, आपण 288 लढवू , अशा भावना काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केल्या़ 
कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संकल्प मेळाव्यात जिल्हाध्यक्षांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याबाबतच्या लोकांच्या प्रश्नांना आपण उत्तरे देऊ शकलो नाही. तेथेच पहिला पराभव झाला, असे पुणो जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष देवीदास भन्साळी म्हणाले.
गेल्या वेळी जिलतील चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरी केली होती़ त्यांचा अनुभव चांगला नाही़ आता आघाडी केली तर हेच बंडखोर पुन्हा उभे राहतील़ स्वतंत्र लढल्यास सर्व जागा निवडून आणू, असा विश्वास सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी व्यक्त केला. सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले, जिलतील चार जागा विरोधकांना गेल्या होत्या़ स्वतंत्र लढले तर निम्म्या जागा निवडून आणू़
सहकारी पक्षाने भ्रष्टाचार केला़ आमच्या नेत्यांवर आरोप झाल़े भ्रष्टाचारी लोकांना दूर ठेवा, असे कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले. साता:याचे जिल्हाध्यक्ष अनंतराव पाटील  म्हणाले, जिलतील 9 पैकी 5 नगरपालिका आपल्याकडे आहेत़ पण विधानसभेच्या 8 पैकी एकच जागा 99 पासून आपल्याकडे आह़े
स्वार्थापोटी काही जण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत होत़े आता चर्चेला पूर्ण विराम द्या़ स्वतंत्र लढायचे असेल तर आतापासूनच तयारी केली पाहिज़े, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सांगितले. सतेज पाटील म्हणाले, आघाडी धर्म फक्त मंत्रलयात पाळला जातो़ संयुक्तपणो 288 जागा लढविल्या तरी टार्गेट 15क् असणार आह़े मग स्वतंत्र का लढवू नये?
 
..तर सुप्रिया सुळे पराभूत झाल्या असत्या
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत़ या दोन्ही ठिकाणी सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून दिली. आमची मेहरबानी झाली नसती तर सुप्रिया सुळे पराभूत झाल्या असत्या, असे देवीदास भन्साळी यांनी सांगितल़े