शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नंदादीप अखंड तेवत ठेवणारे माऊली!

By admin | Updated: February 19, 2015 01:56 IST

दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़

संजय जाधवल्ल पैठण (जि़ औरंगाबाद)दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़ मंदिरातील दिव्यांसाठी तेल पुरविता पुरविता लक्ष्मण मडके यांच्या कार्याची दखल घेत पैठणकरांनी त्यांना माऊली ही पदवी बहाल केली आहे. पैठण शहरात शेकडो वर्षांची परंपरा असलेले मंदिरे आहेत. यात ग्रामदैवत असलेले ढोलेश्वर महादेव मंदिर, गाढेश्वर महादेव, सिद्धेश्वर महादेव, पार्वती, सोमनाथ, इंद्रेश्वर, मल्लिनाथ, मुक्तेश्वर, नागनाथ, भैरवनाथ, उत्तरेश्वर, खोलेश्वर, पिंपळेश्वर, संगमेश्वर आदींसह अनेक महादेवांची मंदिरे आहेत. एकवीरा देवी, कालिका मंदिर, चिचाया मंदिर, सप्तमातृका मंदिर, पीठजा मंदिर, शनि भगवान मंदिर आदीसह अनेक शक्ती मंदिरे, गणेश मंदिरे आहेत. यादव काळात पैठणमध्ये शेकडो मंदिरे निर्माण झाली. यानंतरच्या काळात पैठणने एकनाथ, भानुदास, ज्ञानेश्वर, शिवदिननाथ, कृष्णदयार्णव, अमृतरायजी असे संत दिले. त्यांच्या काळात शहरात अनेक मठ व मंदिरे निर्माण झाली. यातील अनेक मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरात मूर्तीसमोर दिवा लावला जातो तो माऊलींच्या अथक प्रयत्नातूनच.तेलासाठी फेरीच्मंदिरातील दिव्यांना तेवत ठेवण्यासाठी तेल लागते़ प्रारंभीच्या काळात लक्ष्मण मडके स्वत:च्या घरून तेल आणून दिवा लावत. हे करता करता शहरातील इतर मंदिरांत दिवा लावावा, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली; परंतु हे परवडणारे नव्हते. च्यातून मार्ग काढताना त्यांनी शहरात फिरून यासाठी निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार आठवड्यातून दोन दिवस फेरी काढून व निधी जमा करून अनेक मंदिरात दिवे लावण्याचे कार्य त्यांनी सफल केले. जसजसा निधी वाढू लागला तशतशी मंदिराची संख्या वाढत गेली. अवघ्या काही दिवसांत त्यांचे हे कार्य समाजमान्य झाले. मंदिरात दिव्यांना तेल पुरवूनही निधी उरत होता.सन्याशी बुवाने मागितले वचनलक्ष्मण मडके साधारण तिशीत होते. तेव्हा ते शहराचे ग्रामदैवत ढोलेश्वर मंदिरात नियमित दर्शनासाठी जात असे. तेथे सेवेसाठी काशी येथून वृद्ध सन्यासी शंकरबुवा आलेले होते. त्यांनी लक्ष्मण यांना बोलावून मंदिरात तू जिवंत असेपर्यंत दिवा चालू ठेवशील असे मला वचन दे, असा प्रस्ताव ठेवला. त्यांनी शंकरबुवा या सन्याशाला तत्काळ वचन दिले, ते वर्ष होते १९७४. हे वचन ते आजही पाळत आहेत.