शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेवर झळकणार साहित्यिकांची नावे

By admin | Updated: March 17, 2015 00:28 IST

मुंबई आणि नाशिक येथून निघणाऱ्या रेल्वेच्या बोग्यांना साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्षांची नावे देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागातध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे : घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्णत्वास आली आहे. संमेलनासाठी मुंबई आणि नाशिक येथून निघणाऱ्या रेल्वेच्या बोग्यांना साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्षांची नावे देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागातध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.मुंबई आणि नाशिक येथून १ एप्रिल रोजी निघणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांच्या मिळून ३६ बोग्यांना मराठी साहित्यिकांची नावे देण्यात आली आहेत. प्रवासी रसिकांना या साहित्यिकांच्या पुस्तकांचा आस्वाद घेता येणार आहे.बोग्यांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ह. ना. आपटे, वि. दा. सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, प्र. के.अत्रे, आ. रा. देशपांडे (कवी अनिल), वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, शंकरराव खरात, दया पवार, नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी, विंदा करंदीकर, केशव मेश्राम, विजय तेंडुलकर, जी. ए. कुलकर्णी, अण्णा भाऊ साठे, इंदिरा संत, बहिणाबाई चौधरी, ग्रेस, शिवाजी सावंत, सुरेश भट, बाबूराव बागूल, बा. भ. बोरकर, विभावरी शिरूरकर, बाबा कदम, हमिद दलवाई आणि नामदेव ढसाळ यांची नावे देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)४८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजूषेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पाच भाग्यवान साहित्यप्रेमींची नावे लॉटरी पद्धतीने काढण्यात आली. याव्यतिरिक्त स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यवान १०० जणांना १२ मराठी लोकप्रिय साहित्यावरील पुस्तकांचा संच देणार असल्याचेही देसडला यांनी सांगितले. ४प्रश्नमंजूषा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच बेळगाव, कर्नाटक, कारवार, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमधून आणि शहरांमधून स्पर्धकांनी पोस्टाने, ई-मेलवर तसेच एसएमएसच्या माध्यमातून उत्तरे पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.४प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजक सुधीर शिंदे म्हणाले, की मराठीपुस्तकांचा वाचकवर्ग कमी होत असल्याची ओरड सुरू असताना वाचनसंस्कृतीला उत्तेजन मिळण्यासाठी या अभिनव स्पर्धेचे आयोजन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच केले आहे.४पहिल्या पाच भाग्यवंतांची नावे : सुशांत सकपाळ, डॉ. रोहित श्रीकांत आंबेकर (पुणे), नागनाथ देवीदास जावळे, योगेश महारू सूर्यवंशी (देवळा, नाशिक) आणि सुश्रूत लहू खळदकर (पुणे).संमेलनाची तयारी प्रगतिपथावर४साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घुमानकडे जाणारे अमृतसर, बियास आणि उमरतांडा येथील रस्त्यांच्या बांधणी आणि दुरुस्तींची कामे पूर्ण झाली असून, आता हे रस्ते वाहतुकीसाठी तयार झाले आहेत. संमेलनासाठी लागणाऱ्या मंडपाचे कामही आता सुरू झाले असून, त्यात प्रगती होत आहे. मधूनच पावसाचा व्यत्यय येत असला तरी पंजाब आणि स्थानिक प्रशासन मदतीला असल्याने सर्व कामे वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पार पाडली जात आहेत, असेही देसडला यांनी स्पष्ट केले. याशिवाय संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी घुमानमधील नऊ शाळा व महाविद्यालये, गुरुद्वारा येथे निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. पंजाब पोलीस संमेलनाच्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्थाही चोख करत आहेत.५०० स्वयंसेवक४घुमानमधील शाळा-महाविद्यालयांमधील मिळून ३०० व पुणे, सासवड, नाशिक येथील २०० असे एकंदर ५०० स्वयंसेवक संमेलनाच्या व्यवस्थेत सक्रिय सहभागी होत आहेत.