शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 2:52 AM

खराब हवामान, रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा नाही; विमाने वळवितात अहमदाबादला

मुंबई : मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द होत आहे. या विमानसेवेला खराब हवामानाचा फटका बसतो आहे, शिवाय रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा जळगाव विमानतळावर उपलब्ध नसल्याने, ही समस्या वारंवार उद्भवत आहे. ‘उडाण’ योजनेमध्ये या विमानतळाचा समावेश केल्यानंतरही प्रवाशांना विमानसेवा मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबईहून जळगावला जाण्यासाठी ट्रुजेटचे विमान चालविले जाते. उडाण योजनेत १ सप्टेंबरपासून विमानसेवा चालविली जात आहे.सकाळी अहमदाबाद येथून हे विमान जळगावला येते. तिथून मुंबईला येते. त्यानंतर, कोल्हापूर व नंतर परतीचा प्रवास केला जातो. मात्र, यामध्ये कंपनीने इंदूरचा समावेश केला आहे. त्यामुळे जळगावात सकाळी साडेदहा वाजता हे विमान येणे अपेक्षित असताना त्याला विलंब होतोे. परिणामी, या विमानाच्या पुढील सर्व उड्डाणांवर परिणाम होतो. सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून येणारे विमान जळगावात उतरणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा त्याला विविध कारणांमुळे विलंब होतो.जळगाव विमानतळावर रात्री लँडिंग करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत विमान प्रवास शक्य आहे. सूर्यास्तानंतर विमान जळगावात आल्यास हवाई नियंत्रण कक्षातून विमान उतरविण्याची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे हे विमान अहमदाबादकडे वळवले जाते.प्रवाशांचा संतापगेल्या आठवड्यात मुंबईहून आलेले विमान जळगावात न उतरता थेट अहमदाबादला जाण्याचे प्रसंग दोन-तीन वेळा घडले, तर जळगावातून अहमदाबादला जाण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांनादेखील जळगाव विमानतळावर ताटकळत राहावे लागले. मुंबईहून जळगावला जाण्याऐवजी प्रवाशांना अहमदाबादला जावे लागले. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Airportविमानतळ