शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या अपेक्षांना खासदारांनी गोंधळात दडपू नये

By admin | Updated: October 27, 2015 01:58 IST

जनतेशी संबंधित मुद्द्यांवर सार्थकबाधक चर्चा करण्यासाठी संसदेत शालिनता, अनुशासन आणि शिष्टाचार बाळगावा. संसद सदस्यांनी मतदारांच्या अपेक्षा गोंधळात दडपू नयेत.

नागपूर : जनतेशी संबंधित मुद्द्यांवर सार्थकबाधक चर्चा करण्यासाठी संसदेत शालिनता, अनुशासन आणि शिष्टाचार बाळगावा. संसद सदस्यांनी मतदारांच्या अपेक्षा गोंधळात दडपू नयेत. त्यांनी संसदेत केवळ चर्चा करावी, संसदीय कामकाजात अडथळा आणू नये, असे आवाहन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संसद सदस्यांना केले आहे.विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सहभागी होण्यासाठी त्या नागपुरात आल्यानंतर त्यांनी संपादकांशी विशेष संवाद साधला. संसदेच्या सभागृहात गोंधळ घालण्याऐवजी शिस्त बाळगण्याबाबत लोकसभेतील सर्व सदस्यांना पत्रसुद्धा लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.महाजन म्हणाल्या, ‘लोकसभेत संसद सदस्यांच्या वर्तनावरून सामान्य जनतेत तीव्र प्रतिक्रिया आहेत. संसद सदस्यांद्वारे सभागृहात ‘वेल’मध्ये येऊन गोंधळ घालणे, नारेबाजी करणे, घोषणा लिहिलेल्या पाट्या दाखविणे चुकीचे आहे.’ २५ सदस्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आल्याबाबत त्या म्हणाल्या, ‘मी सभागृहात आईची भूमिका बजावित असते. अशा वेळी कधी-कधी मला सदस्यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलावी लागतात.काँग्रेस सभागृहात चर्चेलाच दडपण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक नेहमीच वरचढ राहिले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते सरकारला गंभीर प्रश्न विचारू शकतात. अशा परिस्थितीत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करणे योग्य नाही. संसदीय कार्यप्रणाली नेहमीच विरोधी पक्षाच्या बाजूनेच चालत राहिली आहे. मात्र, त्यानंतरही विरोधी पक्ष कामकाजातच अडथळा आणतो,’ असे त्यांनी सांगितले. जीएसटी आणि भूमी संपादनाच्या मुद्द्यावर त्या म्हणाल्या की, ‘भाजपाने जीएसटीचा विरोध काही कारणांमुळे केला होता. केंद्र जीएसटीमध्ये राज्य सरकारांना योग्य हिस्सेदारी देण्यास तयार नव्हते. राज्य सरकार पूर्णपणे केंद्रावर अवलंबून होती. पंतप्रधान यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जीएसटी विधेयकात सुधारणा केली आहे. आता केंद्र सरकारला जीएसटीमध्ये केवळ ३८ आणि राज्य सरकारला ६२ टक्के हिस्सेदारी देण्यात येईल. या विधेयकातील ही एक प्रमुख सुधारणा आहेत. (विशेष प्रतिनिधी)