शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा अजूनही दुष्काळीच!

By admin | Updated: September 29, 2014 05:37 IST

महाराष्ट्राच्या काही भागांतून पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघारी फिरणार असून मराठवाडा मात्र अजूनही दुष्काळीच राहिला आहे

पुणे : महाराष्ट्राच्या काही भागांतून पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघारी फिरणार असून मराठवाडा मात्र अजूनही दुष्काळीच राहिला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. पावसाळी हंगामात सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठवाड्यात तुरळक पाऊस झाल्याने संपूर्ण वर्ष टंचाईच्या स्थितीचा सामना करावा लागणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीएवढा पाऊस झाला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला. विदर्भात सरासरीच्या केवळ १२ टक्के पाऊस कमी झाला. तर मराठवाड्यात सरासरीच्या ३९ टक्के कमी पाऊस झाला. राज्यात सर्वांत कमी म्हणजे सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ४९, हिंगोली जिल्ह्यात ४८, लातूर जिल्ह्यात ४०, जालना जिल्ह्यात ३५, बीड जिल्ह्यात ३४, वाशिम जिल्ह्यात ३० आणि चंद्रपूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची प्रत्येकी २५ टक्के तूट आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या १५ टक्के अधिक पाऊस झाला. त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ११, मुंबई उपनगरात सरासरीच्या १० टक्के अधिक पाऊस पडला आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झाला. (प्रतिनिधी)