शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या नादी लागले अन्...; भाजपा आ.अमित साटम यांचा मनोज जरांगेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 12:06 IST

सगेसोयरे पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असाच शरद पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे अशी टीकाही साटम यांनी केली. 

मुंबई - शरद पवारांकडून मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय गेम होत असून कपटी शक्तींच्या संमोहनातून जरांगेंनी बाहेर पडावे असा सल्ला भाजपा आमदार अमित साटम यांनी देत शरद पवारांवर निशाणा साधला. 

भाजपा आमदार अमित साटम म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत उपोषणाला बसले तेव्हा एक सामान्य मराठा म्हणून मला खूप अभिमान वाटला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे पालन करत होतात. शिवाजी महाराज ज्यावेळी युद्धावर जायचे तेव्हा कुठलीही सामान्य जनता त्यात भरडली जाता कामा नये असे त्यांचे आदेश असायचे. परंतु आता आपण शरद पवारांच्या नादी लागलात आणि भरकटत जात आहात असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आपल्या आंदोलनाला जो इतर समाजाचा पाठिंबा मिळत होता मात्र आता आपल्या बोलण्या आणि वागण्यानं त्यापासून दूरावत जात आहात असं वाटतं. अजूनही वेळ गेली नाही. कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावं अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आपल्यात गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे. सगेसोयरे पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असाच शरद पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे अशी टीकाही साटम यांनी केली. 

दरम्यान,  शरद पवारांनी गरीब मराठा कुटुंबातून येणारा एकतरी मराठा मोठा केला असेल तर तो दाखवावा. मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे हे ते जाणतात म्हणून कदाचित तुमचा राजकीय गेम होत आहे असं सांगत अमित साटम यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला. 

जरांगे पाटील-प्रसाद लाड यांच्यात जुंपली

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त करत आहेत. मात्र फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी पुढे आलेल्या प्रसाद लाड यांच्यावर जरांगेंनी तोफ डागली. "तू किती पैसेवाला आहेस आणि तू किती भ्रष्टाचारी आहेस. माझ्या नादी लागू नको. मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तुझं घर मोठं करणारी औलाद आहे तू. माझ्या नादी लागू नको. मी तुझं केव्हा नाव घेतलं का?  आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नको. कारण आमच्या लेकरांचं वाटोळं झालंय," अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी ६० वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAmit Satamअमित साटमSharad Pawarशरद पवार