शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:04 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: आपली एकजूट कायम ठेवावी. मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. १३ जुलैपर्यंतची वेळ मनोज जरांगे यांनी सरकारला दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. तर ओबीसीतून आरक्षण देण्याला तीव्र विरोध होत असून, लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले आहे. यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्यातील विविध ठिकाणी सभा, बैठका घेण्यास सुरुवात केली असून, गाफील न राहण्याची सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, येत्या १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे आहे, तोवर कुणीही गाफील राहू नका. सरकारने आपल्याला १३ जुलैपर्यंत आरक्षण दिले नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. सरकारने आरक्षण दिले नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे आहे. आता आपली लेकरे मोठी करायची आहेत. आपल्या लेकरांना मोठे करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. गाफील राहू नका, हा माझा नेता, तो तुझा नेता असा वाद घालत बसू नका. इतकी वर्षे आपल्या नेत्यांना मोठे करत आलो. आता आपल्या मुलांना कसे मोठे करता येईल ते पाहा, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे. आपली एकजूट सर्वांनी पाहिली आहे. एकजूट कायम ठेवा. आपण आपला विषय मागे पडू द्यायचा नाही. सर्वांना शेवटचे सांगतो की, संपूर्ण ताकदीने एकत्र राहा. आपली शक्ती कमी पडू देऊ नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाजाची सर्वांत मोठी बैठक आयोजित करू. एका विशाल मैदानावर ही बैठक घेऊ. या बैठकीत आपण पुढचे नियोजन करू. या सरकारने आपल्याला आरक्षण दिले नाही तर काय करायचे याचा निर्णय त्या बैठकीत घेऊ. २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे त्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल, असे मनोज जरांगे यांनी नमूद केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण