शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून अद्याप मोदी, शहांकडून महाराष्ट्रात हस्तक्षेप नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 08:04 IST

Maharashtra Election Result 2019 हरयाणातला तिढा सोडवणाऱ्या अमित शहांचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष

मुंबई: हरयाणातील सत्तास्थापनेचा तिढा अवघ्या दोन दिवसांत सोडवणाऱ्या दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना महाराष्ट्रातील तिढ्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस उलटले तरी राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तास्थापनेबाबत एकटे पडल्याची टीका करीत शिवसेनेनं आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मध्यस्थी करावी, असं एकप्रकारे सूचित केलं आहे. भाजपाच्या नेतृत्त्वानं महाराष्ट्रातील तिढ्याकडे दुर्लक्ष केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यात शिवसेना, भाजपानं एकत्र निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना स्पष्टपणे कौलही दिला. मात्र तरीही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. याउलट हरयाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टीनं स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र तरीही तिथे निकालानंतर अवघ्या दोनच दिवसात दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात अशाच पद्धतीने बहुमतासाठी शिवसेनेची गरज असल्याने अमित शहा मुंबईत येऊन चर्चा करतील, अशी अपेक्षा होती पण, ते अद्याप आलेले नाहीत वा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवरूनही चर्चा केलेली नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांना डिवचले आहे. मुख्यमंत्री एकटे पडल्याचे दिसतात या राऊत यांच्या वाक्याचा अर्थ शिवसेनेला आता मध्यस्थीसाठी अमित शहाच हवेत आणि त्या शिवाय चर्चा केली जाणार नाही असा घेतला जात आहे.राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम; शिवसेनेला हवी आहे अमित शहांची मध्यस्थीपंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहेत, मुख्यमंत्री फडणवीस एकाकी पडले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र शिवसेनेकडून सतत होत असलेल्या टीकेमुळे मोदी, शहा याबाबतीत लक्ष घालत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून होणारी टीका जोवर बंद होत नाही, तोपर्यंत याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही, अशी भूमिका भाजपा श्रेष्ठींनी घेतल्याचं समजतं.मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायमपंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय हालचालींचा बारीसारीक तपशील ते रोज घेत आहेत. पण शिवसेनेनं आपल्यावर फक्त टीकाच करायची आणि आपण त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे यापुढे होणार नाही, असा इशारा भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या कृतीतून दिला आहे.शिवसेना-भाजपामध्ये नेमकं काय आणि कधी बिनसलं?दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना, अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद ठरलेलं नव्हतं, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेनं त्याच दिवशी सत्तावाटपाच्या चर्चेसाठी होणारी बैठक रद्द केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये बोलणीच होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री पदाबाबत काय शब्द दिला होता हे अमित शहांकडूनच आता ऐकू, असा शिवसेनेत सूर आहे. या पदाबाबत काय करायचं, महत्त्वाची मंत्रिपदं मिळण्याबाबत घ्यायचा निर्णय हे सगळं काही अमित शहांबरोबरच बोलू, असं सांगत शिवसेनेनं भाजपला वेटिंगवर ठेवलं आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी