शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून अद्याप मोदी, शहांकडून महाराष्ट्रात हस्तक्षेप नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 08:04 IST

Maharashtra Election Result 2019 हरयाणातला तिढा सोडवणाऱ्या अमित शहांचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष

मुंबई: हरयाणातील सत्तास्थापनेचा तिढा अवघ्या दोन दिवसांत सोडवणाऱ्या दिल्लीतील भाजप श्रेष्ठींना महाराष्ट्रातील तिढ्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस उलटले तरी राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तास्थापनेबाबत एकटे पडल्याची टीका करीत शिवसेनेनं आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मध्यस्थी करावी, असं एकप्रकारे सूचित केलं आहे. भाजपाच्या नेतृत्त्वानं महाराष्ट्रातील तिढ्याकडे दुर्लक्ष केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्यात शिवसेना, भाजपानं एकत्र निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना स्पष्टपणे कौलही दिला. मात्र तरीही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. याउलट हरयाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टीनं स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र तरीही तिथे निकालानंतर अवघ्या दोनच दिवसात दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात अशाच पद्धतीने बहुमतासाठी शिवसेनेची गरज असल्याने अमित शहा मुंबईत येऊन चर्चा करतील, अशी अपेक्षा होती पण, ते अद्याप आलेले नाहीत वा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवरूनही चर्चा केलेली नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांना डिवचले आहे. मुख्यमंत्री एकटे पडल्याचे दिसतात या राऊत यांच्या वाक्याचा अर्थ शिवसेनेला आता मध्यस्थीसाठी अमित शहाच हवेत आणि त्या शिवाय चर्चा केली जाणार नाही असा घेतला जात आहे.राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम; शिवसेनेला हवी आहे अमित शहांची मध्यस्थीपंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहेत, मुख्यमंत्री फडणवीस एकाकी पडले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र शिवसेनेकडून सतत होत असलेल्या टीकेमुळे मोदी, शहा याबाबतीत लक्ष घालत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेकडून होणारी टीका जोवर बंद होत नाही, तोपर्यंत याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही, अशी भूमिका भाजपा श्रेष्ठींनी घेतल्याचं समजतं.मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायमपंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय हालचालींचा बारीसारीक तपशील ते रोज घेत आहेत. पण शिवसेनेनं आपल्यावर फक्त टीकाच करायची आणि आपण त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे यापुढे होणार नाही, असा इशारा भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या कृतीतून दिला आहे.शिवसेना-भाजपामध्ये नेमकं काय आणि कधी बिनसलं?दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना, अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद ठरलेलं नव्हतं, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेनं त्याच दिवशी सत्तावाटपाच्या चर्चेसाठी होणारी बैठक रद्द केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये बोलणीच होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री पदाबाबत काय शब्द दिला होता हे अमित शहांकडूनच आता ऐकू, असा शिवसेनेत सूर आहे. या पदाबाबत काय करायचं, महत्त्वाची मंत्रिपदं मिळण्याबाबत घ्यायचा निर्णय हे सगळं काही अमित शहांबरोबरच बोलू, असं सांगत शिवसेनेनं भाजपला वेटिंगवर ठेवलं आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी