शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lockdown : कडक निर्बंधांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज, संचारबंदीत खासगी वाहनांची होणार झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:23 IST

Maharashtra Lockdown : बुधवारी रात्री ८ नंतर पोलिसांकडून खासगी वाहनांची झाडाझडती सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई : कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसांकड़ून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात, ठिकठिकाणी कायमस्वरूपी नाकाबंदी करत तंबू उभारण्यात आले आहेत. अशात, मुंबई पोलिसांच्या दिमतीला गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस बल आणि सशस्त्र विभागातील अधिकारी, अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा देण्यात आला आहे.

बुधवारी रात्री ८ नंतर पोलिसांकडून खासगी वाहनांची झाडाझडती सुरू करण्यात येणार आहे. अशात, ज्याठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी ठिकाणे निवडून त्या ठिकाणी ३० एप्रिलपर्यंत कायमस्वरूपी बेरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्याच जोडीला ठिकठिकाणी तंबू उभारण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना आवाहन करण्यासाठी मेगाफोन, वाहने, तात्पुरते निवारे, पाणी, अन्न आदी व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशात, टोल नाक्यावर जास्तीचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील वाहनांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. याशिवाय गेल्यावर्षी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या धारावी,  वरळी, कुरार, भांडूप आदी उपनगरांसह  दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलीस कर्मचार्‍यांसाठी कोविड हेल्पडेस्क क्षेत्रीय स्तरावरही सुरू करण्यात आले आहे तसेच यावेळी पोलिसांनी काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अशात, मुंबई पोलिसांच्या दिमतीला गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस बलाच्या पाच  तुकड्या व सशस्त्र विभागातील १३७५ अधिकारी, अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे.

आठपूर्वी घरी जाण्याची धडपडयात, पोलिसांचा बंदोबस्त पाहता रात्री ८ पूर्वी घरी जाण्यासाठी नागरिकांची धडपड दिसून आली.

अफवावर सायबर पोलिसांचा वॉचया काळात अफवा पसरू नये म्हणून सायबर पोलीस सोशल हालचालीवर लक्ष ठेवून आहेत तसेच कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

मुंबईकरांचे सहकार्य महत्त्वाचेलॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी राहून या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे.

नियमांचे पालन करा - पोलीस महासंचालक कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांनी आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, नियमांचे पालन करून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी बुधवारी केले. संचारबंदीच्या या काळात दोन लाखांहून अधिक पोलीस दोन शिफ्टमध्ये कार्यरत असतील. त्यांच्या मदतीला सुमारे १४ हजार होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच काेरोना रुग्णांना सहाय्य करण्यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. 

अत्यावश्यक सेवेसाठी खासगी वाहनांना मुभा-  लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी आंतरजिल्हा प्रवासासाठी खासगी वाहनाचा वापर करता येणार आहे. - त्यासाठी कसल्याही पासची आवश्यकता असणार नाही. ते आवश्यक ठिकाणी प्रवास करू शकतील, असे संजय पांडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी काही अडचणी आल्यास स्थानिक पोलीस आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.- मुंबईतील पाच हजार सीसीटीव्हीद्वारे पोलीस नियंत्रण कक्षातून सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. तसेच गरज पडल्यास ड्रोनचादेखील वापर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस