शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

Maharashtra Election 2019 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा: जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 9:08 PM

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा सर्वोच्च आणि पवित्र अधिकार प्रदान केला आहे.

मुंबई: भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा सर्वोच्च आणि पवित्र अधिकार प्रदान केला आहे. राज्यात २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपल्या अधिकाराचा हक्क बजावावा आणि नवोदित मतदारांनी लोकशाहीच्या या महत्वाच्या घटनेत सहभाग घेऊन मतदानाला प्राधान्य द्यावे असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आज विलेपार्ले येथे मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आयोजित  "स्वीप"  या कार्यक्रमांतर्गत केले.याप्रसंगी बोरीकर म्हणाले, "मतदार संघ, मतदान केंद्र, मतदार संख्या व उपलब्ध भौगोलिक क्षेत्र यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण ७२ लाख २६ हजार ८२६ एवढी  मतदारसंख्या असल्याने मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी याकरिता पूर्णतः सक्रिय आहे त्याकामी सक्षम निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे". भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती होण्याकरिता 'स्वीप' (सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशनल अँड इलेक्टोरल पार्टीसिपेशन प्रोग्रॅम)  हा उपक्रम राबविला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील विलेपार्ले येथील ‌दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये आज मतदार जागृतीकरिता  एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना आणि नवोदित मतदारांना आवाहन करण्याकरिता हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार जितेंद्र आणि  हिंदी चित्रपटांतून खलनायकाची भूमिका बजावणारे श्री. मुकेश ऋषी  यांनी सहभाग घेतला.  "मतदानाचा हक्क बजावून आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचाच एक भाग बनतो. देशाप्रती आपल्या उत्तरदायित्वाचे भान ठेवत प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदानाच्या अधिकाराचा वापर प्राधान्याने करावा",  असे आवाहन  सिनेअभिनेता श्री. जितेंद्र यांनी उपस्थितांना केले.  तर  "देशभक्तीच्या भावनेचे प्रकटीकरण मतदानाच्या हक्कातून सक्षमरित्या करता येऊ शकते, असे मत श्री मुकेश ऋषी यांनी याप्रसंगी व्यक्त  केले.  याप्रसंगी बोलताना  ते पुढे म्हणाले की  जोपर्यंत या देशातील प्रत्येक नागरिक सजगपणे प्लास्टिकचा वापर टाळत नाही, तोपर्यंत आपल्याला घातक प्लास्टिकपासून मुक्तता मिळणार नाही. हे लक्षात घेता,  प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन  देखील त्यांनी याप्रसंगी केले.    देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे हा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी अनेक मान्यवर कलाकारांनी याप्रसंगी विविध कलांच्या माध्यमातून जनजागृती करत मतदानाचे मह्त्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कब्बडीपट्टू श्रीमती सुवर्णा बारटक्के, अभिनेता व प्रसिद्ध दंतचिकित्सक  डॉ. राहुल चव्हाण,  दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील दशपुत्रे आणि पर्यावरण तज्ज्ञ श्रीमती अश्विनी बोरुडे या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी श्रीमती सोनाली मुळे,  महानगरपालिका सहआयुक्त श्री. भारत मराठे  आणि ‘स्वीप’ समितीचे सदस्य  श्री. सुभाष दळवी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली.  याप्रसंगी सर्व उपस्थितांनी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत शपथ घेतली. या कार्यक्रमाला मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक