शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या डोक्यात साधी गोष्ट शिरत नाही का?; 'त्या' विधानावरून अजित पवार भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:44 IST

उद्धव ठाकरेंनी त्या धरणाबद्दलच्या विधानावरून केलेल्या टिप्पणीवर अजितदादांनी घुश्श्यातच प्रतिक्रिया दिली आहे. 

ठळक मुद्देदहा रुपयांत थाळी देण्याचं शिवसेनेचं आश्वासन काही दिवसांपासून प्रचारात गाजतंय.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भांडणात अजित पवार खेचले गेले आणि त्यांचं 'ते' वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत आलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच प्रमुख नेत्यांच्या झंझावाती सभा सुरू आहेत आणि त्यांच्यात वाक् युद्ध पेटल्याचं पाहायला मिळतंय. दहा रुपयांत थाळी देण्याचं शिवसेनेचं आश्वासन काही दिवसांपासून प्रचारात गाजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही त्यावरून नुकतीच शाब्दिक चकमक उडाली. पण, दोघांच्या भांडणात अजित पवार खेचले गेले आणि त्यांचं 'ते' वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत आलं. उद्धव ठाकरेंनी त्या धरणाबद्दलच्या विधानावरून केलेल्या टिप्पणीवर अजितदादांनी घुश्श्यातच प्रतिक्रिया दिली आहे. 

'तो' माझा नाईलाज होता, बाळासाहेबांच्या अटकेवरील प्रश्नावर भुजबळ उत्तरले

राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

माझ्या राजकीय कारकिर्दीतील 'ते' अतिशय चुकीचं विधान होतं. त्याबद्दल मी माफी मागितली, आत्मक्लेष केला. एखादी गोष्ट चुकल्यावर, त्याबद्दल माफी मागितल्यावर तो विषय काढत नाहीत ना आपल्याकडे. पण, ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या डोक्यात शिरत नाही का तेच कळत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. तुझे वडीलच सांगत होते, 'वाजवा पुंगी, हटवा लुंगी' आणि आज चिरंजीव लुंगी घालून प्रचार करत आहेत. आमची २५ वर्षं युतीत सडली, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि आज ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून लोकांसमोर गेलेत, असा टोलाही त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत लगावला. कुठलीच कामं केली नसल्यानं जुने मुद्दे उकरून काढायचे हे पोरकट राजकारण शिवसेना करत असल्याचं त्यांनी सुनावलं. 

सरकार फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो - अजित पवार 

पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची शरद पवार यांनी बार्शीतील सभेत खिल्ली उडवली होती. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे की स्वयंपाक करायचा आहे, असा सवाल पवार यांनी शिवसेनेला केला होता. त्यानंतर, बार्शीतल्याच सभेत उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका केली. जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, पण आम्हाला त्या धरणातलं पाणी नको, असे म्हणत उद्धव यांनी अजित पवारांवर बाण सोडला होता. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार