शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उद्धव ठाकरेंच्या डोक्यात साधी गोष्ट शिरत नाही का?; 'त्या' विधानावरून अजित पवार भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:44 IST

उद्धव ठाकरेंनी त्या धरणाबद्दलच्या विधानावरून केलेल्या टिप्पणीवर अजितदादांनी घुश्श्यातच प्रतिक्रिया दिली आहे. 

ठळक मुद्देदहा रुपयांत थाळी देण्याचं शिवसेनेचं आश्वासन काही दिवसांपासून प्रचारात गाजतंय.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भांडणात अजित पवार खेचले गेले आणि त्यांचं 'ते' वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत आलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच प्रमुख नेत्यांच्या झंझावाती सभा सुरू आहेत आणि त्यांच्यात वाक् युद्ध पेटल्याचं पाहायला मिळतंय. दहा रुपयांत थाळी देण्याचं शिवसेनेचं आश्वासन काही दिवसांपासून प्रचारात गाजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही त्यावरून नुकतीच शाब्दिक चकमक उडाली. पण, दोघांच्या भांडणात अजित पवार खेचले गेले आणि त्यांचं 'ते' वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत आलं. उद्धव ठाकरेंनी त्या धरणाबद्दलच्या विधानावरून केलेल्या टिप्पणीवर अजितदादांनी घुश्श्यातच प्रतिक्रिया दिली आहे. 

'तो' माझा नाईलाज होता, बाळासाहेबांच्या अटकेवरील प्रश्नावर भुजबळ उत्तरले

राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

माझ्या राजकीय कारकिर्दीतील 'ते' अतिशय चुकीचं विधान होतं. त्याबद्दल मी माफी मागितली, आत्मक्लेष केला. एखादी गोष्ट चुकल्यावर, त्याबद्दल माफी मागितल्यावर तो विषय काढत नाहीत ना आपल्याकडे. पण, ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या डोक्यात शिरत नाही का तेच कळत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. तुझे वडीलच सांगत होते, 'वाजवा पुंगी, हटवा लुंगी' आणि आज चिरंजीव लुंगी घालून प्रचार करत आहेत. आमची २५ वर्षं युतीत सडली, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि आज ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून लोकांसमोर गेलेत, असा टोलाही त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत लगावला. कुठलीच कामं केली नसल्यानं जुने मुद्दे उकरून काढायचे हे पोरकट राजकारण शिवसेना करत असल्याचं त्यांनी सुनावलं. 

सरकार फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो - अजित पवार 

पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची शरद पवार यांनी बार्शीतील सभेत खिल्ली उडवली होती. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे की स्वयंपाक करायचा आहे, असा सवाल पवार यांनी शिवसेनेला केला होता. त्यानंतर, बार्शीतल्याच सभेत उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका केली. जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, पण आम्हाला त्या धरणातलं पाणी नको, असे म्हणत उद्धव यांनी अजित पवारांवर बाण सोडला होता. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार