शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

उद्धव ठाकरेंच्या डोक्यात साधी गोष्ट शिरत नाही का?; 'त्या' विधानावरून अजित पवार भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:44 IST

उद्धव ठाकरेंनी त्या धरणाबद्दलच्या विधानावरून केलेल्या टिप्पणीवर अजितदादांनी घुश्श्यातच प्रतिक्रिया दिली आहे. 

ठळक मुद्देदहा रुपयांत थाळी देण्याचं शिवसेनेचं आश्वासन काही दिवसांपासून प्रचारात गाजतंय.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भांडणात अजित पवार खेचले गेले आणि त्यांचं 'ते' वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत आलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच प्रमुख नेत्यांच्या झंझावाती सभा सुरू आहेत आणि त्यांच्यात वाक् युद्ध पेटल्याचं पाहायला मिळतंय. दहा रुपयांत थाळी देण्याचं शिवसेनेचं आश्वासन काही दिवसांपासून प्रचारात गाजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही त्यावरून नुकतीच शाब्दिक चकमक उडाली. पण, दोघांच्या भांडणात अजित पवार खेचले गेले आणि त्यांचं 'ते' वादग्रस्त विधान पुन्हा चर्चेत आलं. उद्धव ठाकरेंनी त्या धरणाबद्दलच्या विधानावरून केलेल्या टिप्पणीवर अजितदादांनी घुश्श्यातच प्रतिक्रिया दिली आहे. 

'तो' माझा नाईलाज होता, बाळासाहेबांच्या अटकेवरील प्रश्नावर भुजबळ उत्तरले

राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील- उद्धव ठाकरे

माझ्या राजकीय कारकिर्दीतील 'ते' अतिशय चुकीचं विधान होतं. त्याबद्दल मी माफी मागितली, आत्मक्लेष केला. एखादी गोष्ट चुकल्यावर, त्याबद्दल माफी मागितल्यावर तो विषय काढत नाहीत ना आपल्याकडे. पण, ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या डोक्यात शिरत नाही का तेच कळत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. तुझे वडीलच सांगत होते, 'वाजवा पुंगी, हटवा लुंगी' आणि आज चिरंजीव लुंगी घालून प्रचार करत आहेत. आमची २५ वर्षं युतीत सडली, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि आज ते त्यांच्याच मांडीला मांडी लावून लोकांसमोर गेलेत, असा टोलाही त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत लगावला. कुठलीच कामं केली नसल्यानं जुने मुद्दे उकरून काढायचे हे पोरकट राजकारण शिवसेना करत असल्याचं त्यांनी सुनावलं. 

सरकार फक्त पतंगबाजी व हवाबाजीत मश्गुल; शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका

गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो - अजित पवार 

पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांत जेवण देण्याच्या शिवसेनेच्या घोषणेची शरद पवार यांनी बार्शीतील सभेत खिल्ली उडवली होती. 'शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही आणि आता ते थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य चालवायचं आहे की स्वयंपाक करायचा आहे, असा सवाल पवार यांनी शिवसेनेला केला होता. त्यानंतर, बार्शीतल्याच सभेत उद्धव ठाकरेंनी पवारांवर टीका केली. जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, पण आम्हाला त्या धरणातलं पाणी नको, असे म्हणत उद्धव यांनी अजित पवारांवर बाण सोडला होता. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार