शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा एकदा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:22 AM

२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता.

ठळक मुद्दे१९९५ मध्ये राज्यात युती सरकार असताना हा पुरस्कार सुरू झाला.१९९७ मध्ये पहिला पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता

मुंबई : राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च सन्मान गेली पाच वर्षे कोणालाही प्रदान करण्यात आलेला नव्हता. आता मात्र हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची भूमिका घेत महाविकास आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख,  राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे शासकीय सदस्य तर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजपती बाबा कल्याणी, क्रिकेटपटू संदीप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य असतील.२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता आणि त्यावर वादही झाला होता. त्यानंतर सरकारने हा पुरस्कार कोणालाही दिला नाही. आता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समिती गेल्या पाच वर्षांतील पुरस्कारही जाहीर करणार का, याबाबत उत्सुकता राहील.१९९५ मध्ये राज्यात युती सरकार असताना हा पुरस्कार सुरू झाला. पहिलाच पुरस्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला, पण बाळासाहेबांनी पुरस्कार स्वीकारण्यास नम्र नकार दिला. राज्यात माझे सरकार आहे आणि मीच पुरस्कार घेणे उचित होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.१९९७ मध्ये पहिला पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आणि त्यावेळच्या पुलंच्या भाषणाने वादळ निर्माण केले होते. त्याच वेळी धारावीतील एका पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी, ‘ जुने पुलं पाडून आता नवीन पुलं बांधण्याची गरज आहे’, असा टोला हाणला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र