शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

“सगळे शक्य, फक्त इच्छा हवी, सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही, पण...”; राज ठाकरेंचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 15:18 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०२४ साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या, असे सांगत मनसेला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीचे केंद्रातील आणि राज्यातील नेते राज्यभर प्रचारसभा घेत असून, महाविकास आघाडीचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व महाराष्ट्रभर सभा घेताना पाहायला मिळत आहे. मनसे पक्षही यात मागे नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर दौरा करत असून, अनेक ठिकाणी प्रचारसभा घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळी राज ठाकरे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांवर टीका करत आहेत. 

उमरखेड येथील प्रचारसभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ही उमरखेडमध्ये झाली होती. शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांना बघायला कोणी येत नाही. त्यांचे कुटुंब काय करते ते ही बघत नाही. कारण आता माणसाची काही किंमतच उरली नाही. आमची मने मेली आहेत. जर तुम्ही जिवंत आहात असे वाटत असेल तर आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा आणि मनसेला मतदान करा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

सगळे शक्य, फक्त इच्छा हवी, सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही, पण...

आमच्याकडे तरुण तरुणी जिल्हा सोडून जात आहेत. आमदार खासदार यांना विचारत नाही. निवडणूक खेळ समजतात. निवडणूक झाली की आम्ही विसरून जाणार. यानंतर ५ वर्षांनी पुन्हा निवडणूक होणार. विकास कसा होतो, हे पाहिले आहे. नाशिकमध्ये रस्ते बनवले. किती वर्षे झाले पाहा, अजूनही ते तसेच आहेत. कंत्राटदारकडून टक्के घेणे बंद झाला की, रस्ते चांगले होतात. रस्त्यात खड्डा दिसला तर खड्ड्यात बांधून मारेन असा दम मी कंत्राटदारला दिला होता, असे सांगत, सगळ्या गोष्टी शक्य आहे. फक्त इच्छा पाहिजे. सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही. पण महाराष्ट्राच्या विकासाची नक्कीच स्वप्न पडतात. राज्यकर्ते आणि राजकारणाच्या मेंदूत कमतरता आहे. २० नोव्हेंबर ही तारीख जवळ आली आहे. अशी संधी सारखी मिळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, तुमच्या दूध, पाणीपट्टीचे दर हे राजकारणी ठरवितात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०२४ साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या, असा टोल राज ठाकरे यांनी लगावला. माणसाची किंमत देशात नाही परदेशात जाऊन कळते. अमेरिकचे राष्ट्रध्यक्ष ओबामा हे पदावरून खाली उतरत असताना त्यांनी एक कायदा केला होता. जेवढे कुत्रे बॉम्बस्फोटात जातील, त्यांना तुम्हाला परत अमेरिकेत आणावे लागेल. ज्या देशात कुत्र्यांची काळजी आहे तर माणसाची किती असेल? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थितांना केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४umarkhed-acउमरखेडRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना