शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

"एक हैं तो सेफ हैं "; PM मोदींच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्हाला काय शिकवता आम्ही सगळे एकत्र"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:35 IST

एक हैं तो सेफ हैं या घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगेची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातल्या सभेतून एक हैं तो सेफ हैं ची घोषणा दिली. काँग्रेस आणि विरोधक जातीजातींमध्ये मतभेद करुन त्यांना वेगवेगळं करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. पंतप्रधान मोदींच्या आरोपांना आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.  आम्हाला काय शिकवता, आम्ही सगळे एकत्र आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातल्या सभेतून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी काँग्रेसवर आरोप करताना पंतप्रधान मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं ची घोषणा दिली. याआधीही योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. या घोषणेला आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बुलढाण्यातल्या सभेत बोलताना कटेंगेंची गोष्ट करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"त्यांनी सांगितलं आहे की एक हैं तो सेफ हैं, बटेंगे तो कटेगें. कोण कापणार आहे, कुणाची हिम्मत आहे. कटेंगेंची गोष्ट करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत. आम्हाला काय शिकवता. आम्ही सगळे एकत्र आहोत.  बारा बलुतेदार समाज माझ्यासोबत आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या घोषणेवरुन अजित पवार यांनीही रोष व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. "महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी कोणी करू नये. येथील लोकांनी नेहमीच जातीय सलोखा राखला आहे. बाहेरून काही लोक इथे येऊन घोषणा देतात. पण महाराष्ट्राने जातीय विभाजन कधीच मान्य केले नाही. येथील लोक छत्रपती शाहूजी महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे पालन करतात," असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे