शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस

By यदू जोशी | Updated: October 31, 2024 07:26 IST

Maharashtra Assembly Election 2024 : लोकांना सगळे कळते, मला खलनायक बनविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मतदार हाणून पाडतील, असा शाब्दिक हल्ला उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : राजकारणातील घरे, कुटुंब फोडण्याचे महाराष्ट्रातील जनक शरद पवार हेच आहेत, आजही ते हेच करत आहेत तरी त्यांची ही कृती म्हणजे चाणक्यनीती आणि मी तसे थोडेसेही केले तर ते डावपेच? हा कुठला न्याय? लोकांना सगळे कळते, मला खलनायक बनविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मतदार हाणून पाडतील, असा शाब्दिक हल्ला उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. यदु जोशी यांनी फडणवीस यांच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न : तुम्ही डावपेच खेळता असे आरोप करून खलनायक म्हणून तुमची प्रतिमा तयार केली जाते. मी दोन पक्ष फोडून परत आलो हे तुमचेच वाक्य होते.... त्या बद्दल काय म्हणाल? उत्तर : मी तसे गमतीने बोललो होतो एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात. मी पक्ष फोडला हा दावा मी कधीही केलेला नाही. पण गमतीही सार्वजिनक मंचावर करू नयेत, हे आता लक्षात ठेवले पाहिजे. महाविकास आघाडीच्या तिन्ही घटकांनी दिवसरात्र माझ्यावर, कुटुंबावर हल्ले केले. देवेंद्र फडणवीसला व्हिलन ठरवा हे त्यांचे एकमेव ध्येय होते. ते यशस्वी होऊ शकले नाहीत. फडणवीसांचा संबंध नाही त्याच्याशी जोडून त्यांची बदनामी केली जाते, हे लोकांना कळू लागले आहे, विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे. मी कसा आहे, जातीपातींपलिकडे जाऊन काम करतो हे लोकांना कळते. 

प्रश्न : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील फक्त आपल्यालाच लक्ष्य करतात, असे का होते? उत्तर : मी राज्याचा प्रमुख नाही, तरी सर्व निर्णयांची जबाबदारी ते माझ्यावर टाकतात. त्यांच्या या वक्तव्यांमुळे जनता फार विश्वास ठेवून माझ्याविषयी मत वाईट करेल असे मला वाटत नाही. माझी आजही जरांगे पाटील यांना एकच विनंती केली की तुम्हाला जे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले लायक वाटतात त्यांच्याकडून लेखी घ्या की, त्यांचे सरकार आले तर ते ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देतील. यांच्यापैकी एकानेही लेखी तर सोडाच तसे विधानही केलेले नाही. मी मराठा आरक्षण सर्वांत आधी दिले. ते हायकोर्टात टिकवले, एक लाख मराठा उद्योजक घडवले, ‘सारथी’ची स्थापना करून नोकऱ्यांसाठी तरुणांना प्रशिक्षण दिले, फेलोशिप दिली, तरी मलाच दोषी ठरवायचे, आणि ३०-३५ वर्षे सत्तेत होते त्यांना जाबच विचारायचा नाही. याच्या पाठीमागची भूमिका मराठा समाजाला बरोबर समजते. 

प्रश्न : प्रस्थापित आमदारांना पुन्हा संधी दिली. नवीन चेहऱ्यांना संधी का दिली नाही? भाजपची अशी काय मजबुरी होती? उत्तर : आम्ही काही निकष ठरविले होते आणि त्यात जे ५० टक्क्यांवर जातील त्यांना अँटिइन्कम्बन्सी नाही, जे ५० च्या आत राहतील त्यांना ती आहे असे निश्चित केले. काही सर्वेक्षणे आम्ही केली, कार्यकर्ते, नागरिकांची मते जाणून घेतली.  संघ विचार परिवारातील मान्यवरांची मते जाणून घेतली. संघाचा थेट काही रोल नव्हता. 

प्रश्न : निवडणुकीत काका-पुतणे, नातेवाइक, बाप-बेटे यांची गर्दी दिसते, आपला पक्ष तर घराणेशाहीविरुद्ध बोलत आलाय, मग आता तुम्ही तेच करता आहात?उत्तर : यावेळी कुरुक्षेत्रासारखी लढाई झाली आहे, काही इकडचे तिकडे, तिकडचे इकडे आहेत.   तात्त्विक लढाई नेहमीच असते,  कधीकधी वास्तविकतेचे भान ठेवूनही लढावे लागते. आता महाराष्ट्र राजकीय संक्रमणावस्थेतून जात आहे. आजचे राजकारण कायम राहणार नाही.  जिंकलो पाहिजे आणि कालसंगत राहिले पाहिजे यासाठी काही निर्णय करावे लागतात.

प्रश्न: अमित ठाकरेंबाबत आपली भूमिका काय? आपले मत तेच मुख्यमंत्री शिंदेंचेही आहे का? उत्तर : माझी भूमिका ही आहे की राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीला, मोदीजींना समर्थन दिले, एकही जागा मागितली नाही. आता ते वेगळे लढत आहेत, त्यांची आपली भूमिका आहे, पण त्यांनी मदतीची अपेक्षा अमितसाठी केली आहे तर भाजपची ही भूमिका आहे की मदत केली पाहिजे.  शिंदे यांचेही तेच मत होते, पण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे असे मत आहे की, आपण लढलो नाही तर अमितऐवजी उद्धवसेनेच्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल. रणनीतीचा गोंधळ (स्ट्रॅटॅजिकल कन्फ्युजन) आहे. मार्ग निघेल.  

प्रश्न : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातच राहणार की केंद्रात जाणार? महायुती जिंकली तर तुम्ही मुख्यमंत्री असाल का?  विधानसभेची निवडणूक कोण जिंकणार आणि कोणाचे सरकार येणार हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत त्याची उत्तरेही वेगवेगळी असतील का? २०१९ मध्ये तसे घडले होते म्हणून विचारतोय!उत्तर : आमच्या पक्षात व्यक्तीचा निर्णय पक्ष घेत असतो. पक्ष म्हणेल तिथे राहील. घरी जायला सांगितले तर घरी जाईन.(खळाळून हसत) .... यावेळी अशी दोन उत्तरे नसतील. मला वाटते की महाराष्ट्रात बहुमताचेच सरकार येईल आणि ते महायुतीचेच असेल.  क्रॉस अलायन्स सरकार येणार नाही. सरकार स्थापन करायला आम्हाला आमदार कमी पडणार नाहीत. २०१९ मधील प्रयोगाची पुनरावृत्ती होणार नाही. मुख्यमंत्रिपदाचा आमचा फॉर्म्युला ठरला आहे. निवडणुकीच्या निकालानंतरच त्याचा निर्णय होईल. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचे सांसदीयमंडळ याबाबत निर्णय करेल.   शिंदे, अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. माझ्या पक्षात मी नाही तर सांसदीय मंडळ निर्णय घेत असते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार