शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य आणि साहित्यिकाला जात-धर्म नसतो

By admin | Updated: January 18, 2015 00:52 IST

विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा

इंद्रजित भालेराव : उमरखेड येथे १०व्या मराठा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन अविनाश खंदारे - उमरखेडविठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाध्यक्ष कवी इंद्रजित भालेराव यांनी येथे केले.जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (माहेश्वरी खुले नाट्यगृह) येथे आयोजित १० व्या मराठा साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवसरकर, नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड, प्रा. डॉ. अशोक राणा, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, मधुकर मेहकरे, उमरखेडच्या नगराध्यक्ष उषा आलट आदी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष भालेराव यांनी छापील भाषण न वाचता, येथे मुले आली आहेत, त्यांच्यासाठी मी कविता म्हणणार आहे, असे म्हणत आपल्या भाषणाला सुरूवात केली. शेतकरी म्हणजे मराठा नाही, जो शेतकरी तो मराठा, असे मी समजतो. शेतकऱ्यांच्या सुख-दु:खावर माझे लिखाण असून, सामाजिक भूमिकाही शेतकऱ्यांच्या दु:खात दडली आहे.जिजाऊच्या बालपणीची कविता लिहिणे किती अवघड होते, असे सांगत ‘जिजाऊ शिकते... एकुलती एकही’ ही कविता सादर केली. ‘बाप’ ही कविता अभ्यासक्रमातून बदलण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. तेव्हाची आठवण सांगताना भालेराव म्हणाले, बाप कधी बदलता येत नाही. त्यामुळेच आजही अभ्यासक्रमात ती कविता आहे. ‘जिथे राबतो तो माझा शेतकरी बाप’ ही पाचवीच्या अभ्यासक्रमाला असलेली आपली कविता भालेराव यांनी गाऊन सादर केली. शेवटी त्यांनी बहुजन समाजातील युवकांनी साहित्य निर्मितीमध्ये येऊन बहुजन समाजाला स्पर्धेच्या युगात आणण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. संमेलनाचे उद्घाटक प्रा. शेषराव मोरे म्हणाले, मी कुठलाही साहित्यिक नाही. मी सतत देशहिताच्या संबंधावर लिखाण करीत असतो. त्याला मी स्वत:चं साहित्य म्हणत नाही. पण साहित्यिकांनी माझ्या भूमिकेतून साहित्य निर्मिती करावी आणि त्याला राष्ट्रीयस्तरावर पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकातून डॉ. प्र. भा. काळे यांनी उमरखेड तालुक्याच्या जडणघडणीचा आणि साहित्य परंपरेचा आढावा सादर केला. माजी संमेलनाध्यक्ष बाबा भांड यांनी, साहित्य हे न्याय मागण्याचे साधन झाले असून त्यामुळे बहुजन समाजातील युवकांनी साहित्य निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले. उद्घाटन समारंभाला माजी आमदार विजय खडसे, डॉ. छाया महाले, राम देवसरकर, डॉ. निर्मला पाटील, प्राकश शिंदे, सुरेश कदम उपस्थित होते. साहित्य संमेलनात युवक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. (शहर प्रतिनिधी)