शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

ज्यांना जायचे त्यांना खुशाल जाऊ द्या!

By admin | Published: July 22, 2014 2:10 AM

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे स्वर उमटू लागले आहेत.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे स्वर उमटू लागले आहेत. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी कडक भूमिका घेतली असून, पक्ष कोणत्याही दबावापुढे नमते घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे असले ते जाऊ शकतात, असे पक्षश्रेष्ठींनी म्हटले आहे. 
याशिवाय आसाम, हरियाणा आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री न बदलण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला, असे उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले. यासंदर्भात पक्षाची भूमिका प्रवक्ते  अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली. लोक असंतुष्ट आहेत, तर राहू देत. एकेक राज्यातून एकेक नेता जात आहे. त्या राज्यातील जनता सर्व बघत आहे, असे सिंघवी म्हणाले. नारायण राणो यांना मुख्यमंत्री बनायचे होते. अशाप्रकारे मुख्यमंत्रीपद दिले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
ज्यांना पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर आक्षेप आहे, त्यांनी पक्ष सोडावा, असेही ते म्हणाले. त्यांनी राणो यांचे नाव घेतले नाही परंतु त्यांचे संकेत राणो यांच्या दिशेने होते. केवळ महाराष्ट्रात नव्हेतर आसाम, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगालमध्ये देखील पक्षात बंडाचे वृत्त आहे. 
आसाममध्ये 32 आमदारांसह हिमांत बिस्वा सर्मा यांनी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडवले आहे. सर्मा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सोबतच त्यांनी बंडात कोणत्याही थराला जाण्याची तयारी दर्शविली आहे. 
दुसरीकडे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील कडक भूमिका घेतली आहे. सर्मा यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनवण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आसामध्ये असंतुष्ट आणि पक्षश्रेष्ठींमध्ये आरपारची लढाई 
सुरू झाली आहे. काश्मीरमध्ये माजी खासदार लालसिंग यांनी बंडखोरी केली. 
तर नॅशनल कॉन्फरन्सची काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी आली. हरियाणामध्ये खासदार चौधरी वीरेंद्रसिंग यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात बंड करून 
पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. 
पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे तीन 
आमदार फटून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. तरीदेखील काँग्रेस पक्षश्रेष्ठी नमते घेण्यास तयार नाही. 
 
महाराष्ट्र, हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक जिंकणो कठीण आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लांब आहे. तर मग असंतुष्टांसमोर नमते काघ्यावे, काँग्रेस नेतृत्वाला वाटते आहे, असे सूत्रंनी सांगितले. महाराष्ट्राबाबत  रविवारी रात्री सोनिया गांधी यांनी राज्यातील मोठय़ा नेत्यांशी चर्चा केली होती आणि स्पष्ट केले की, पक्ष कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही.