शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्याशी कोल्हापूरचा संपर्क तुटला : रस्ते वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 14:23 IST

पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देचार जिल्ह्यातील सव्वालाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविलेकोल्हापूरातील १२९, सातारा ६, सांगलीतील ११ गावांचा संपर्क तुटलेला कोयना धरणातील विसर्ग १ लाख २१ हजार क्युसेकवरुन १ लाख ९ हजार क्युसेकपर्यंत खाली

पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यातील १ लाख ३२ हजार ३६० नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, सुमारे एक लाख नागरीक अजूनही अडकून पडले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, कोल्हापूरला जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरशी रस्ते संपर्क तुटला आहे. कोल्हापूरामधे प्रथमच इतका मोठा पूर आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यामधे निर्माण झालेल्या पूर स्थितीची माहिती म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा खोऱ्यातील धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पुढील तीन दिवस कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाबळेश्वर आणि कोल्हापूरच्या घाटभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूरला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुणे बेंगळुरु महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील किणी आणि शिरोली गावाजवळ रस्त्यावर चार ते साडेचार फूट पाणी आहे. तर, बेळगावीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. सांगली-कोल्हापूर मार्ग देखील बंद असल्याने कोल्हापूरचा रस्ते संपर्क तुटला असल्याचे म्हैसेकर म्हणाले. कोल्हापूरातील १२९, सातारा ६, सांगलीतील ११ गावांचा संपर्क तुटलेला आहे. सुमारे लाखभर नागरीक अजूनही येथे अडकलेले आहेत. या सर्वांना तेथून बाहेर काढणे शक्य नाही. त्यामुळे हवाई मार्गाने येथील नागरिकांना अन्नाचा पुरवठा करण्यात येत आहे. या भागात पाऊस असल्याने उलट ०.१ मीटरने बुधवारी पाणी पातळीत वाढ नोंदविली. कोयना धरणातील विसर्ग १ लाख २१ हजार क्युसेकवरुन १ लाख ९ हजार क्युसेकपर्यंत खाली आणण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणी अडकेलल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि नौदलाची मदत घेण्यात येत असल्याचे म्हैसेकर म्हणाले. 
--------------विभागात पूरस्थिती असल्याने शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये. पाणी असल्याचे ठिकाणी उतरु नये, तसेच पुराच्या पाण्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नये. पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात जिल्हा प्रशासनाने आवाहन केल्यानंतर नागरिकांनी त्वरित घरातून बाहेर पडावे.डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणेकोल्हापूरशी संपर्क

* अलमट्टीतून चार लाखांचा विसर्ग 

कृष्णानदीवर असलेल्या उत्तर कर्नाटकातील अलमट्टी या धरणातून पावणेतीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. सध्या कृष्णेत ३ लाख २ हजार क्युसेक पाणी जमा होत आहे. पावसाचा जोर असल्याने बुधवारी पुराचे पाणी ०.१ मीटरने वाढले आहे. तसेच, येथील घाटमाथ्यावर अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अलमट्टीतून चार लाख क्युसेक पर्यंत विसर्ग वाढविण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारकडे केली होती. त्याप्रमाणे विसर्ग वाढविण्यात आला आहे. या धरणातून ५ लाख २० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविता येवू शकतो. कर्नाटकातील रायचूर येथे पूरस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे आणखी विसर्ग वाढविण्यास कर्नाटक सरकार तयार नाही. अलमट्टीतून किमान साडेचार लाख क्युसेक विसर्ग करावा अशी मागणी असल्याचे विभागीय आयुक्त, डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले. --------------

पूरामुळे झालेले मृत्यू

पुणे    ४सातारा    ७सांगली    २सोलापूर    १कोल्हापूर    २----------------------

सहाशे गावातील पाणी पुरवठा बंद

पुरामुळे पाणी पुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ३९०, सांगलीतील ११३, सातारा ९यथील ९१ गावांतील पाणी पुरवठा बंद असून, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी बाधित गावातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. --------------

गावांशी संपर्क तुटला

जिल्हा        गावांची संख्या        अडकलेल्या नागरीकांची संख्या     सुरक्षितस्थळी हलविलेले नागरीक

कोल्हापूर        १२९                                         ३५,५१४                                     ५१,७८५सातारा               ६                                              ८००                                        ६२६५सांगली              ११                                           ४९,०००                                     ५३,२२८सोलापूर              -                                                -                                          ७,७४९पुणे                    -                                                  -                                        १३,३३६-----------------------पूररेषा लवकरच निश्चित करणारदर पंचवीस वर्षांनी पूररेषा निश्चित केली जाते. त्यात गेल्या पंचवीस वर्षांतील आणि शंभर वर्षांतील सर्वोच्च पावसाचा विचार केला जातो. त्यानुसार हरित (ग्रीन) आणि लाल (रेड) रेषा निश्चित केली जाते. लवकरच या रेषा अंतिम केल्या जातील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले. 

-------------पुणे : ग्रामीण भागातील १०३ मोठे व ४३३ छोटे पुलांपैकी ३४ पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यातील पुणे महानगरपालिका हद्दीतील ३, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील २, पुणे कॅन्टोन्मेंट १, असे ४० पूल पाण्याखाली गेले आहेत.सातारा : ८ पूल पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्ग उपलब्धसांगली : सहा राज्यमार्ग,  १५ जिल्हामार्ग व इतर सहा जिल्हा मार्ग पाण्याखालीकोल्हापूर : १०४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि ८९ रस्ते पाण्याखाली

---------------------  कोल्हापूरमधे ६ एनडीआरएफ पथके दाखल असून, ६ पथके रवाना होत आहेत. एक नौदल पथक पोहोचले

-  सांगलीमध्ये ३ एनडीआरएफ पथके पोहचली, असून ३ पथके रवाना होत आहेत

- साताऱ्यात १ एनडीआरएफ पथक पोहचले

-  टेरिटोरिअल आर्मीचीकोल्हापूरमध्ये ४ व सांगलीमध्ये १ पथक कार्यरत

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरWaterपाणीRainपाऊसriverनदीfloodपूर