शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना; एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 12:44 PM

'पंकजा मुंडे, रोहिणी खडसेच्या पराभवामागे षडयंत्र'

मुंबई : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्यातील भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. 

भाजपाच्या आजच्या नेतृत्वामध्ये मत्सर अन् द्वेषभावना आहे. निवडणुकीत तिकीट दिले नाही, त्यामागे राजकारण होते. रोहिनी खडसे तिकीट मागत नव्हत्या, तरीही दिले. अपमानास्पद वागून दिली जाते, हा विश्वासघात आहे. आधी असे राजकारणात होत नव्हते. गोपीनाथ मुंडे असते तर ही आली वेळ नसती, अशी खंत व्यक्त करत एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला.

याचबरोबर, गोपीनाथ मुंडे असताना आम्ही नेहमी हसत-खेळत राजकारण केले. त्यांच्या संघर्षामुळे भाजपाला सध्या चांगले दिवस आले. गोपीनाथ मुंडे कार्यकर्त्यांचे आधार होते. ते पाठीत खंजीर खुपसणारे नव्हते. पंकजा, रोहिणीच्या पराभवामागे षडयंत्र होते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

दरम्यान, या आधी ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचे एकनाथ खडसे यांनी  पक्षनेतृत्वाकडे सांगत नाराजी व्यक्त केली होती. तसेच, एकनाथ खडसे दिल्लीत गेले असता भाजपाच्या वरिष्ठांनी भेट न दिल्याने ते थेट शरद पवारांच्या भेटीला गेले. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत तर जाणार नाहीत ना, अशी चर्चाही सुरू झाली होती. याशिवाय, पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी विधान भवनात दाखल झाले.

शरद पवार, पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने एकनाथ खडसेंच्या मनात नेमके काय सुरू आहे, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. तसेच, पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीतही पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे गैरहजर राहिले होते. त्यामुळे आजच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडGopinath Mundeगोपीनाथ मुंडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार