शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 6:34 AM

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे गावाकडेच मतदार यादीत नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी, ७ मे रोजी होणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या आणि चर्चेतल्या मतदारसंघांत मतदान होणार असून मतदानासाठी गाव गाठण्यास चाकरमान्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे गावाकडेच मतदार यादीत नाव आहे. त्यामुळे अनेकांनी मतदानासाठी गावी जाण्याला प्राधान्य दिले असून शनिवारपासूनच सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. खासगी गाड्यांनाही त्यामुळे मागणी वाढली आहे. 

परिणामी भाड्यात कृत्रिम वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. एरवी साताऱ्याला जाण्यासाठी साध्या खासगी गाड्या ५०० रुपये भाडे आकारतात. आता ते ८०० रुपये झाले आहे. तर कोल्हापूरसाठी हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत. सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील काही मतदारांनी तर बसचे ग्रुप बुकिंगही केल्याचे एका वाहतूकदाराने सांगितले.

अनेक गाड्यांमध्ये झाले आरक्षण     सोमवारी कामावरून सुटल्यानंतर थेट गाव गाठण्याकडेही अनेक चाकरमान्यांचा कल आहे. त्यामुळे सोमवारी गावाकडे जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग आणखी वाढण्याची शक्यता आहे.     अनेक गाड्यांमध्ये ९० टक्के प्रवाशांचे बुकिंग झाले आहे, अशी माहिती मुंबई बस मालक संघटनेचे उपाध्यक्ष मुराद नाईक यांनी दिली.

टॅग्स :state transportएसटी