शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या जयसागर धरणाचे झाले नूतनीकरण

By admin | Updated: July 12, 2017 03:08 IST

भाद्रपद शुद्ध ४ शके १८८३ श्री गणेश चतुर्थी, दिनांक १४ सप्टेंबर १९६१ रोजी जव्हारचे राजे नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे शुभहस्ते झाले होते.

हुसेन मेमन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : गेली ५३ वर्षे जव्हारकरांची तृष्णा भागवत असलेल्या जयसागर धरणाचे उदघाटन भाद्रपद शुद्ध ४ शके १८८३ श्री गणेश चतुर्थी, दिनांक १४ सप्टेंबर १९६१ रोजी जव्हारचे राजे नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे शुभहस्ते झाले होते. आणि जव्हारकरांची पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबली. त्यावेळेच्या ६ हजार लोकसंख्यसाठी बांधण्यात आलेले धारण असल्याने वाढत्या जव्हार शहरातील लोकसंख्येसाठी चिंतेची बाब बनत चालली होती. हे लक्षात घेवून जव्हार नगरपरिषदेने जय सागर धरणाचे नूतनीकरण करून पाणीसाठा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या जव्हार शहरातील जय सागर धरणावर पर्यटकांची गर्दी होतांना दिसत आहे.
जव्हारच्या शहराला लागुनच १ कि.मी. अंतरावर झरिपा नावाचा, अनेक जिवंत झरे असलेल्या नाल्यावर हे धरण बांधण्यात आले आहे. तो ४०० फुट लांब व सुमारे ६० ते ६५ फुट उंचीचे हे धरण आहे. जव्हारच्या विकासाच्या व नागरी सुविधांच्या विविध संकल्पनांसह जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी धरण असावे असे स्वप्न जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजे साहेब यांचे होते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी १० जून १९४८ साली जव्हार संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करतांना त्यांनी धरण बांधणेसाठी रु .५ लक्ष एवढा निधी राखून ठेवला व तो जव्हार नगरपालिकेकडे सुपूर्द केला होता. पुढे महाराष्ट्र शासनाने आवश्यक असलेला उर्विरत रु . ७,२७,१५८.०० इतका निधी धरण बांधणे कामी उपलब्ध करून दिला होता.
जि.प. व जव्हार नगरपरिषदेच्या सहकार्याने जयसागर धरणला लागून असलेल्या गार्डनचे नूतनीकरण करण्यात आले असून जयसागर धरणाला जाण्यासाठी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. धरणाजवळ असलेल्या गार्डनमध्ये नवीन गवताळ लावले असून, खुला रंगमंच, धरणामगील दरी बघण्यासाठी रेलिंग ही लावण्यात आले आहे, तसेच बच्चे कंपनी साठी खेळणी ही लावण्यात आली आहे.
जयसागर धरणाचे नूतनीकरण केल्यामुळे नागरिक मोठया प्रमाणात धरणाला भेट देत आहेत. नूतनीकरण केल्यामुळे धरणाचा परिसर अत्यंत सुंदर झाला आहे.
- पारस संजय सहाणे, पर्यटनप्रेमी, जव्हार.
जयसागर धरण बागेचे नूतनीकरण झाले.