शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 3:44 PM

मोबाईल, इलेक्ट्रीक वाहनांमध्ये सध्या लिथिअम आयनची बॅटरी वापली जाते. ही बॅटरी धोकादायकही आहे व कमी क्षमतेची आहे. सध्या ह्युंदाईकडे 1000 किमीचे अंतर कापणारी कार आहे. मात्र, टाटा, महिंद्रासह अन्य कंपन्यांकडे 100 किमीच्या आसपास किंवा त्याहून अधिक रेंजच्या कार आहेत. टाटा नेक्स़ॉन 300 किमीची रेंज देते. यापुढे काही अद्याप तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते.

ठळक मुद्देसंशोधकांनी लिथिअम आयनच्या तुलनेत तिप्पट ऊर्जा देणारी बॅटरी तयार केली आहे.सध्याच्या काळात एखादी कार 400 किमीचे अंतर एका चार्जिंगवर पार करत असेल तर या बॅटरीची कार एका चार्जिंगवर 1600 किमी अंतर कापेल. या बॅटरीवर निश्चितच वाहन निर्मात्या कंपन्यांच्या उड्या पडणार आहेत. कारण सध्या कोणत्याही कंपनीकडे एवढी मोठी रेंज देणारे तंत्रज्ञान नाहीय.

प्रदूषण, सरकारी तिजोरीवर पडणारा भार आदी समस्यांमुळे केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या वाहनांची रेंज आणि किंमत मोठी अडचण आहे. तसेच चार्जिंग स्टेशनही जवळपास नाहीतच. अशा अनेक अडचणींमुळे इलेक्ट्रीक वाहनांचा काळ येण्यास मोठा अवधी जाणार आहे. मात्र, यावर आयआयटी मुंबई (IIT) आणि शिव नादर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी असे तंत्रज्ञान शोधून काढले आहे की, एका चार्जिंगमध्ये ही बॅटरी असलेले वाहन तब्बल 1600 किमीचे अंतर कापणार आहे. 

सध्या ह्युंदाईकडे 1000 किमीचे अंतर कापणारी कार आहे. मात्र, टाटा, महिंद्रासह अन्य कंपन्यांकडे 100 किमीच्या आसपास किंवा त्याहून अधिक रेंजच्या कार आहेत. टाटा नेक्स़ॉन 300 किमीची रेंज देते. यापुढे काही अद्याप तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या बॅटरींमध्ये लिथिअम आयन वापरले जाते. यापेक्षा पर्यावरणाला अनुकुल असे लिथियम-सल्फर (Li-S)  च्या बॅटरींचे उत्पादन घेतले जाऊ शकते. असे तंत्रज्ञान आयआयटीने विकसित केले आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार संशोधकांनी लिथिअम आयनच्या तुलनेत तिप्पट ऊर्जा देणारी बॅटरी तयार केली आहे. ही Li-S बॅटरी पेट्रोलियम रसायनची उत्पादने जसे की सल्फर, कृषी टाकाऊ वस्तू आदींच्या वापरातून बनविण्यात येऊ शकते. शिव नादर विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक बिमलेश लोखब यांनी सांगितले की, हे संशोधन एक उपाय शोधण्यासाठी हरित रसायन विज्ञानाच्या सिद्धांताला केंद्रीत करते. याद्वारे बनविलेली बॅटरी तिप्पट ते चौपट ऊर्जा क्षमतेसह सुरक्षा व स्वच्छ स्रोत आहे. 

सध्याच्या काळात एखादी कार 400 किमीचे अंतर एका चार्जिंगवर पार करत असेल तर या बॅटरीची कार एका चार्जिंगवर 1600 किमी अंतर कापेल. म्हणजेच ही कार एका चार्जिंगमध्ये मुंबई ते दिल्ली अंतर कापेल. या बॅटरीवर निश्चितच वाहन निर्मात्या कंपन्यांच्या उड्या पडणार आहेत. कारण सध्या कोणत्याही कंपनीकडे एवढी मोठी रेंज देणारे तंत्रज्ञान नाहीय. तसेच भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजाराची मागणी लक्षात घेता उद्या अशा प्रकारच्या बॅटरीलाच मोठी मागणी राहणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन

किम जोंग उन जिवंत! बोलावली आपत्कालीन बैठक; उत्तर कोरियाकडून पुन्हा फोटोद्वारे 'दर्शन'

CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा

CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता

कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनpollutionप्रदूषण