शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

श्याम मानवांच्या भुताटकीकडे अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 3, 2015 10:55 IST

श्याम मानव विरुद्ध सनातन संस्था असा वाद सध्या पेटलेला असताना यामध्ये शिवसेना उतरली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून श्याम मानव यांच्यावर तुफान टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ - श्याम मानव विरुद्ध सनातन संस्था असे वाक्-युद्ध सध्या पेटलेले असताना यामध्ये शिवसेना उतरली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून श्याम मानव यांच्यावर तुफान टीका केली आहे. श्याम मानवांनी सनातनसारख्या संस्थांमुळे भारताचा अफगाणिस्तान होईल अशी भीती व्यक्त केली होती. त्याचा संदर्भ देत महाराष्ट्रातील अनेक बिळांत छुपे पाकिस्तानी वळवळत आहेत. या सगळ्यांमुळे महाराष्ट्राचा अफगाणिस्तान आधीच झालाय व अशा हिरव्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी श्याम मानव वगैरे भुताखेतांकडून कधीच झाली नाही, अशा शब्दांमध्ये आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
 
सामनाच्या अग्रलेखातील मुद्दे:
 
हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार करणार्‍या संस्था व व्यक्तींना खतम करायचे असा अफझलखानी विडा उचलणार्‍यांची मोठी यादी आहे. त्या यादीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या श्याम मानवांचे नाव सध्या आघाडीवर आहे. धर्म व अध्यात्म क्षेत्रातील आपले संत-महात्मे असतील (वाटल्यास त्यांना ‘बुवा’ म्हणा) नाही तर आता सनातनच्या निमित्ताने जे चालले आहे तो सर्व प्रकार म्हणजे हिंदुत्वाच्या प्रचारकांचा कोंडमारा करणारा आहे. सनातन संस्थेवर वेळीच बंदी न घातल्यास महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती या श्याम मानव नामक भुतास वाटत आहे. अशा भुतांची पैदास सध्या वाढू लागली आहे. हिंदुत्वविरोधी भुतांना हवा तसा नंगानाच करण्याची मुभा आपल्या देशातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याने दिली आहे व त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करून ही भुते प्रसिद्धी मिळवत असतात. तोच त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग असल्याने त्यांच्या रोजगाराची साधने बुडू नयेत असे दयाळू हिंदुत्ववाद्यांना वाटते. काही बुवा, महाराज असतील किंवा ‘सनातन’सारख्या संघटना असतील. आम्ही काही त्यांचे वकीलपत्र घेतलेले नाही, पण ज्याप्रकारे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांना साधा जामीनही मिळू दिला जात नाही हासुद्धा तालिबानी प्रकार नाही काय? त्यांच्यावर जे काही आरोप ठेवले आहेत त्यांचा तपास, चौकशा, खटले सुरूच राहतील, पण जामीन नाकारणे ही न्याय्य हक्कांची पायमल्ली आहे.
 
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम महिलांनी निवडणुकीच्या, किंबहुना राजकारणाच्या फंदातच पडू नये असा एक फतवा काढण्यात आला आहे. ‘मज्लिसे-शुरा-उलेमा-ए-कोल्हापूर’ या संस्थेच्या मौलवींनी हा फतवा जारी केला आहे. हा देखील ‘अफगाणिस्तान’ होत असल्याचा पुरावा आहे. हिंदुस्थानात काही ठिकाणी दहशतवादी ‘इसिस’चे झेंडे फडकवले जात आहेत. आझाद मैदानावरील अमर जवान ज्योतीवर लाथा मारणारी अवलाद महाराष्ट्राचे अफगाणिस्तान करण्याचे स्वप्न पाहात आहे व त्यासाठी कामाला लागली आहे. मात्र या भयंकर लोकांविरोधात ‘ब्र’ काढण्याची हिंमत या हिंदुत्वविरोधी भुताटकीत अजिबात नाही. ओवेसीचे ‘एमआयएम’ ज्याप्रकारे देशात जहर पसरवत आहे तो प्रकार देशाला अफगाणिस्तानच्या दिशेने नेणाराच आहे. तेव्हा ‘एमआयएम’वर बंदी घाला अशी मागणी सनातनबरोबर जोडली असती तर या भुताटकीस सध्याच्या पितृपंधरवड्यात खर्‍या नि:पक्षपाताचे पुण्य लाभले असते, पण हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारकांवरच तुटून पडायचे व आपली भुताटकी जिवंत ठेवायची हीच या लोकांची उलटी खोपडी आहे. त्यामुळे या भुताटकीस कधीच मोक्ष मिळणार नाही! ही अशी भुते नाचतच राहतील. हिंदूंनी त्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करावे.