शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षार्थींनो, काळजी करू नका; आम्ही सांगतो तेवढं करा, सगळं ठीक होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 06:09 IST

‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/पुणे :  ‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ‘कोरोना’सारखे आव्हान परतवून लावल्यावर आता आणखी कसली भीती? आता कोणतीही परीक्षा असली तरी आपण मार्ग काढू शकतो. तेव्हा, चिंता करायची नाही. मस्त पेपर द्यायचे!

राज्यातून एकूण १४,७२,५७४ विद्यार्थ्यांनी तर मुंबईतून ३ लाख ३५ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाच्या माहितीनुसार, मुंबईत ५०५ मुख्य केंद्रे तर ७७७ उपकेंद्रांचे परीक्षा केंद्र म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागात एकूण ६७ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन मुंबई विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे. 

समुपदेशन सेवा परीक्षा काळातही कार्यरत राहणार 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे वर्षभरानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रचलित पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत.

या पेपरच्या वेळात बदल 

राज्य मंडळाने काही विषयांच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यासंबंधी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. ५ आणि ७ मार्च या दिवशी होणाऱ्या परीक्षा ५ आणि ७ एप्रिल रोजी होणार आहेत.

अडचण आल्यास समुपदेशन उपलब्ध 

एससीईआरटी आणि मुंबई विभागीय मंडळाकडून प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण आल्यास किंवा शंका निरसनासाठी विद्यार्थी या समुपदेशकांना संपर्क करू शकणार आहेत. मुंबईत ३५, पूर्व मुंबईत १, उत्तर मुंबईत ११, दक्षिण मुंबईत ९, मुंबई उपनगरात १७ तर पश्चिम मुंबईत १५ समुपदेशकांची नोंदणी करण्यात आली आहे.  प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षाकाळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

शाखानिहाय मुंबईतील विद्यार्थीसंख्या 

विज्ञान - ९९०९४कला - ५०८४५वाणिज्य - १८०४९५व्होकेशनल - ४४७८आयटीआय - १०८

मुंबई विभागातील जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे

केंद्र - उपकेंद्र - परिरक्षक 

ठाणे -  १५८- २५२- १३ पालघर -५३- १५५- ११ रायगड- ४६- १४४- १५ मुंबई (दक्षिण )- ६४- ५६ - ७

मुंबई (पश्चिम)- १०८ -८८- १३ मुंबई (उत्तर)- ७६- ८२ - ८

एकूण- ५०५-७७७- ६७

परीक्षार्थींनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. काळजी करण्याचे काही कारण नाही. पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. मुलांना मानसिक आधार द्यावा. - वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण