शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 06:18 IST

नव्या आदेशाची आवश्यकता नाही : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाला आव्हान देणारी तृणमूल काँग्रेसची याचिका निकाली काढताना यावर नवीन आदेश देण्याची आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केले.

नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल

तृणमूल काँग्रेसने दाखल केलेली ही आक्षेप घेणारी याचिका कोलकाता उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर याला तृणमूलने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या विशेष खंडपीठाने म्हटले आहे की, निवडणूक आयोग मतमोजणी कर्मचाऱ्यांची निवड करू शकतो. १३ एप्रिलच्या परिपत्रकात केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त तैनातीची तरतूद आहे. यात कोणतीही चूक नाही.

निवडणूक आयोगाची भूमिका निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मतमोजणीच्या कामात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत यात कोणत्या तरी प्रकारच्या गोंधळाची तृणमूल काँग्रेसची भीती निराधार आहे. परिपत्रकात केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी संयुक्तपणे काम करतील, असे आधीच स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

बंगालमधील डायमंड हार्बर येथील एका मतदान केंद्रांवर फेरमतदानासाठी झालेली गर्दी.

तृणमूल काँग्रेसचे आक्षेप काय होते ?

तृणमूलच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी चार मुद्दे उपस्थित केले. यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक १३ एप्रिल रोजी काढण्यात आले. परंतु जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना त्याबद्दल २९ एप्रिल रोजी समजले.

मतमोजणीत एक केंद्रीय प्रतिनिधी आधीच उपस्थित असूनही आयोगाला 3 अनियमिततेची शंका का वाटत आहे, हा दुसरा मुद्दा तर, प्रत्येक मतमोजणी केंद्रावर केंद्राचा एक अधिकारी निरीक्षक म्हणून आधीच उपस्थित आहे, असे तिसऱ्या मुद्द्यात नमूद असून परिपत्रकात नियुक्त राज्य सरकारचे अधिकारी नियुक्त करण्याची तरतूद असूनही त्यांची नियुक्ती केली नसल्याचा दावा चौथ्या मुद्द्यात केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाची भूमिका कोणती ?

जरी निवडणूक आयोगाच्या परिपत्रकात मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहायक या दोन्ही पदांवर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालय या निर्णयावर आक्षेप घेऊ शकत नाही. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या आखत्यारितील आहे.

१५ केंद्रांवर फेरमतदान; ८७% मतदानाची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांतील १५ केंद्रांवर शनिवारी फेरमतदान पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या ठिकाणी ८६.९० टक्के मतदान झाले असून ६ वाजेपर्यंत हा आकडा ८७ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

२९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान काही केंद्रांवर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्याची गांभीर्याने दखल घेत निवडणूक आयोगाने या फेरमतदानाचा आदेश दिला होता. हे मतदान मगराहाट पश्चिम येथील ११ व डायमंड हार्बर येथील ४ केंद्रांवर पार पडले.

तृणमूलने केले स्वागत

बंगालमधील मतमोजणीसाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बाबत निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे भाजप व तृणमूल काँग्रेसने शनिवारी स्वागत केले.

English
हिंदी सारांश
Web Title : EC has authority to select counting staff: Supreme Court on TMC plea

Web Summary : The Supreme Court dismissed Trinamool Congress's plea challenging the EC's order on deploying central staff for counting votes in West Bengal. The court stated the EC can select counting staff and found no fault in the joint deployment of central and state government employees.
टॅग्स :Courtन्यायालयElectionनिवडणूक 2026