शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटताच त्यांनी आघाडी कशी तोडली?

By admin | Updated: September 26, 2014 08:36 IST

मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्याने कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून आपण कुठलीही तडजोड न स्वीकारता पारदर्शक निर्णय घेतल्याने कोणाचे हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे. महायुतीची ताटातूट झाल्यानंतर एक तासाच्या आत राष्ट्रवादीने आघाडी तोडली हा निव्वळ योगायोग नसून या पक्षाची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत हे ओळखण्याइतपत राज्याची जनता खुळी नाही, असे सूचक भाष्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.गेली १५ वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत चकार शब्दही न काढणाऱ्या राष्ट्रवादीने राज्यापेक्षा महत्त्वाकांक्षा मोठी मानत मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. जागावाटपाबाबत अवास्तव मागण्या करून आघाडी संपुष्टात आणली, असा घणाघातही मुख्यमंत्र्यांनी केला. तर राष्ट्रवादीच्या ताठरपणामुळेच आघाडी तुटल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्र परिषदेत केला. भाजपा-सेनेच्या युतीचे काय होते याची वाट पाहत बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेेत पुढाकार न घेता वेळकाढूपणा केला, असे सांगताना त्यांनी भाजपा-राष्ट्रवादीचे काही सेटिंग तर नव्हते ना, अशी शंकाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जागावाटपाची बोलणी सुरू असताना दोन दिवसांपूर्वी अचानक मुख्यमंत्रीपदाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आणि या बोलणीला खिळ बसविण्याचाच प्रयत्न केला, असा आरोप ठाकरे यांनी केला. आज राष्ट्रवादीने आघाडी तोडली. आता उद्या आणखी काही नवीन युती अस्तित्वात येते का ते बघा असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उद्या मोठ्या राजकीय घडामोडी होऊ शकतात, असे संकेत दिले. गेल्या पावणेचार वर्षांत सरकार चालविताना अनेक बरेवाईट प्रसंग आले पण तरीही राष्ट्रवादीला सोबत नेण्याचा प्रयत्न आपण केला. राज्यातील जनतेच्या हिताआड येणारे कुठलेही निर्णय आपण घेतले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची आणि १४४ जागांची राष्ट्रवादीची मागणी अव्यवहार्य आणि कोणत्याही निकषात बसणारी नव्हती हे सांगताना त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तर १२४ पेक्षा अधिक जागा देण्याची तयारी होती, असे ठाकरे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)