शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

हरसूल दंगलीवरून विधानसभेत गदारोळ

By admin | Updated: July 17, 2015 23:54 IST

नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या दंगलीवर सरकारने चर्चा करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या दंगलीवर सरकारने चर्चा करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्यामुळे आज विधानसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सरकारने चर्चेची मागणी फेटाळल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वात विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्थगन प्रस्तावाच्या सूचना आल्या तेव्हा कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य जिवा पांडू गावित यांना हरसूलबाबत बोलायचे होते. मात्र पीठासीन अधिकारी चैनसुख संचेती यांनी सांगितले की, कालच तुम्ही यावर बोललेले आहात. मी यावर सरकारला निवेदन करायला सांगतो. अध्यक्षांनी पुढचा विषय पुकारला तेव्हा गावित यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शेकापचे गणपतराव देशमुख, दिलीप वळसे पाटील असे सारेच उभे राहिल्याने सभागृहात थोडा काळ गोंधळाची स्थिती झाली. सांसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता यांनी विनंती केल्यानंतर अध्यक्षांनी गावित यांना बोलण्याची संधी दिली. गावित म्हणाले, त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा सुरू झाला आहे व तेथून काही अंतरावर असणाऱ्या हरसूल गावी दंगल सुरू आहे. आजूबाजूच्या गावांत दंगल पसरण्याची शक्यता आहे. तीन दिवस दंगल सुरू होती. मुळात तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लोक चिडले आणि त्यांनी हल्ला केला. एक खून झाला. तर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केल्याने लोक भडकले. यावर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन व महसूल मंत्री खडसे यांनी निवेदन केले. महाजन म्हणाले, मी तेथे दोनवेळा गेलो. स्थिती तणावाची होती, पण आता निवळली आहे. मी पुन्हा तिथे जात आहे व नंतर सोमवारी निवेदन करतो. तेव्हा गणपतराव देशमुख पुन्हा उभे राहिले. पोलीस गोळीबारात एक माणूस मरण पावला आहे. ही बाब गंभीर आहे. तीन दिवस तिथे दंगल आहे ती शमविण्यात सरकारचे अपयश आहे. तेव्हा ताबडतोब चर्चा करावी, असा आग्रह त्यांनी धरला. अध्यक्षांनी पुढचे कामकाज सुरू केले. तेंव्हा विरोधकांना बोलूच द्यायचे नाही ही कोणती पद्धत आहे, असे म्हणत त्यांनी सभात्याग केला.