शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जयगड होणार मालवाहतूक केंद

By admin | Updated: December 2, 2014 23:32 IST

जयगड पोर्ट : जगभरातील मालाची आयात-निर्यात सुलभतेने होणार

रत्नागिरी : जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याचा सामंजस्य करार झाल्याने हे बंदर येत्या काही कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत न्हावा-शेवा (मुंबई), जे. एन. पी. टी. व गोवा या मोठ्या बंदरांवर मालवाहतुकीचा मोठा भार आहे. जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडले जाणार असल्याने अन्य बंदरांवरील मालवाहतुकीचा भार कमी होणार आहे. डिंगणी ते जयगड पोर्ट असा ३४ किलोमीटर्सचा मालवाहतूक रेल्वेमार्ग होणार आहे. जिल्ह्यातील धामणखोल-जयगड येथे बहुउद्देशीय बारमाही चालणारे बंदर जयगड पोर्ट लिमिटेड या खासगी विकासकामार्फत विकसित केले जात आहे. जलवाहतूक ही सर्वांत स्वस्त, परवडणारी वाहतूक म्हणून जगभरात ओळखली जाते. त्यामुळे राज्यातील न्हावा-शेवा, जेएनपीटी व गोवा बंदरातून मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावरील मालवाहतूक करणारी जहाजे नेहमीच दाखल होत आहेत. परिणामी तीनही बंदरांवर कामाचा व्याप प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नवीन बंदराची शासनाला तसेच जागतिक क्षेत्रातील आयात-निर्यातदार कंपन्यांनाही प्रतीक्षा होती. जयगड बंदर ही अपेक्षा पूर्ण करू शकते. यातूनच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर विकसित करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठीच गेल्या दोन-तीन वर्षांपासून जयगड बंदर कोकण रेल्वेला मालवाहतूकीच्या दृष्टीने जोडले जावे, याबाबत कोकण रेल्वे व शासनाबरोबर या कंपनीची चर्चा सुरू होती. हा मार्ग रत्नागिरी स्थानकापासून उक्षी किंवा भोके येथून पुढे जयगड बंदराला जोडला जावा, असा प्रारंभीचा सूर होता. मात्र, नंतर हा विचार बदलला असून, आता कोकण रेल्वेमार्गावरील डिंगणी (संगमेश्वर) येथून हा मालवाहतुकीचा एकेरी मार्ग जयगड बंदराला जोडण्याचा सामंजस्य करार राज्य सरकारच्यावतीने मेरिटाइम बोर्ड, कोकण रेल्वे महामंडळ व जयगड पोर्ट लि. यांच्यादरम्यान सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. त्यामुळे जयगड बंदर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलवाहतुकीचे कोकणातील मोठे केंद्र बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण रेल्वेला जोडले गेल्याने जयगड बंदरात येणाऱ्या देश-विदेशातील जहाजांतील मालाची ने-आण रेल्वेने करणे शक्य होईल. जयगड पोर्ट ही कंपनी यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बंदरात येणाऱ्या जहाजांकडून भाडे आकारणी करणार आहे. तसेच रेल्वे माल वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जयगड परिसरात वाहतुकीशी निगडीत व्यवसायांनाही बरकत येणार आहे. (प्रतिनिधी)