शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरजवळ एसी बस पेटून ५ जण जळून खाक

By admin | Updated: May 30, 2014 01:45 IST

धावत्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी घडली़

अनिल रिठे, तळेगाव (जि. वर्धा) - धावत्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी घडली़ यात १५ प्रवासी गंभीररीत्या भाजले असून जखमींपैैकी पाच जणांना नागपूरला हलवण्यात आले आहे. बसच्या वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून तिघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर बसचालक राजेश व क्लीनर पळून गेले. बाबा ट्रॅव्हल्सची बस सुमारे ४० प्रवासी घेऊन जळगावहून नागपूरकडे जात होती. पहाटे ४.४५ च्या सुमारास सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या जैन मंदिराजवळ या बसने अचानक पेट घेतला. क्षणार्धात आगीने संपूर्ण बसला विळखा घातला. चालकाने बस थांबवल्यावर काही प्रवाशांनी खिडकी व दारातून उड्या टाकल्या़ यातील साखरझोपेत असलेल्या पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला़ मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे़ यात सुनील सच्चिदानंद पाल (रा. मटकापूर, बिहार) यांचा नऊ महिन्यांचा मुलगा आदित्य व पत्नी श्वेता (२८) यांचा समावेश आहे.