शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या काळात शेतकरी रडकुंडीला

By admin | Updated: October 10, 2014 22:58 IST

अजित पवार : इचलकरंजीत सभा

इचलकरंजी : ‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या कालावधीत साखरेचे दर उतरले. आता उसाला चांगला दर कसा मिळणार, तर कांद्याचे भावही उतरल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच वेगवेगळ्या जातीधर्मातील नेतृत्वाला प्रलोभने दाखवित सत्तेवर आल्यावर मोदींनी रामदास आठवले, यशवंत जानकर आणि राजू शेट्टी यांना दिलेला मंत्रिपदाचा शब्द फिरविला, अशी टीका केली.राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, मागील वर्षी याचवेळी तीन हजार रुपये क्विंटल असणारी साखर आता २७०० रुपये झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळणार, याची चिंता असतानाच कांद्याचेही भाव उतरल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. याउलट शरद पवार कृषिमंत्री असताना ते नेहमी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळावा, यासाठी नियोजनबद्ध धोरण आखत; पण मोदी सरकार व्यापारधार्जिणे आहे.वीज चोरी करणारा आमदार निवडून आणल्यामुळे इचलकरंजीची मान शरमेने खाली गेल्याची खंत व्यक्त करीत पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्वच्छ प्रतिमेच्या मदन कारंडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. पक्षाशी गद्दारी करून भाजपला पाठिंबा देणाऱ्या अशोक स्वामी यांची हकालपट्टी करीत असल्याची घोषणा केली. तर पक्षातील अन्य स्थानिक नेत्यांनी यापासून धडा शिकून उद्यापासून कारंडे यांच्या प्रचाराच्या कार्यात झोकून द्यावे, असे सांगितले. (प्रतिनिधी)